AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मनपाचे कौतुक, पावसाचा जोर वाढल्याने काय दिल्या सूचना?

पाऊस आला की जागोजागी पाण्याचा साठा. यामुळे वाहतुक कोंडीपासून ते पायी मार्गस्थ होणेही जिकिरीचे होत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई मनपाने मोठा बदल करुन पाणी साचणार नाही यासाठी जागोजागी पंप उभारले आहेत. शिवाय पावसाळा सुरु होण्यापूर्वी जी कामे होत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातला धोका टळत आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मनपाचे कौतुक, पावसाचा जोर वाढल्याने काय दिल्या सूचना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 05, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई : राजकारण काही का असेना पण केलेल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. सोमवारी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिध्द केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाढत्या पावसाच्या जोरामुळे (Mumbai MNP) मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांना आढावा घ्यावा लागला. दरम्यान, मुंबई मनपा प्रशासनाने (Heavy Rain) पावसाळ्याच्या तोंडावर योग्य नियोजन केलेले आहे. शहरातील वॉटर लॉगिंगच्या स्पॉटची संख्या ही कमी झालेली आहे. 299 ठिकाणी हे स्पॉट आहेत. तर हिंदमाता परिसरात पाऊस झाला की पाणी साचते अशी परस्थिती असायची पण आता या भागात देखील पाणी साचत नाही. तर इतर भागात वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तरी मुंबई थांबलेली नाही म्हणत शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

यंदा मुंबईची तुंबई होणार नाही

पाऊस आला की जागोजागी पाण्याचा साठा. यामुळे वाहतुक कोंडीपासून ते पायी मार्गस्थ होणेही जिकिरीचे होत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई मनपाने मोठा बदल करुन पाणी साचणार नाही यासाठी जागोजागी पंप उभारले आहेत. शिवाय पावसाळा सुरु होण्यापूर्वी जी कामे होत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातला धोका टळत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढून देखील कुठे वाहतूक कोंडी झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा दरम्यान सांगितले.

गरज भासेल तिथे धावून येणार बेस्ट

मुंबईमध्ये अशी 25 ठिकाणे आहेत जिथे थोडा जरी पाऊस झाला तर रेल्वे वाहतूक ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना अधिकचे पैसे देऊन घर जवळ करावे लागते. शिवाय ओढावलेल्या स्थितीचाही रिक्षाचालक, टॅक्सीधारक गैरफायदा घेऊन अधिकचे पैसे घेतात. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेच्या बेस्टची सोय करणे महत्वाचे आहे. जेणेकरुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. शिवाय त्यांना अधिकचे पैसेही खर्ची करावे लागणार नाहीत. एवढेच नाही तर अशा ठिकाणी नागरिकांसाठी चहा, पाणी नाष्ट्याची सोय करण्याच्या देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबईतील कामावर जाणाऱ्या प्रत्येकाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ह्या महत्वाच्या ठरणार आहेत. रेल्वे वाहतूक बंद होताच नागरिकांना टॅक्सी किंवा रिक्षाचा आधार हा घ्यावाच लागतो पण आता याठिकाणी बेस्टे किंवा एसटी पोहचणार आहे. त्यामुळे आहे त्या दरातच नागरिकांना घर जवळ करता येणार आहे. कामावर जाणारा नागरिक थोडाच अधिकचे पैसे घेऊन कामावर जातो. या साधारण: बाबींचा विचार करुन शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन झाले तर सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप