AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या विधानावर सपकाळ ठाम, पहा काय म्हणाले फडणवीसांबद्दल?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी फडणवीस सरकारची तुलना औरंगजेबाच्या राज्यकारभाराशी केली होती. यावरून आता वातावरण तापलं असून, आपन फडणवीसांवर नाही तर सरकारच्या राज्यकारभारावर टीका केल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

त्या विधानावर सपकाळ ठाम, पहा काय म्हणाले फडणवीसांबद्दल?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 6:25 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी फडणवीस सरकारची तुलना औरंगजेबाच्या राज्यकारभाराशी केली होती. यावरून आता वातावरण तापलं असून, आपन फडणवीसांवर नाही तर सरकारच्या राज्यकारभारावर टीका केल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्हीचा या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेक उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळतोय तो अत्यंत क्रूर आणि वाईट स्वरुपाचा आहे. सध्याचा जो देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार आहे तो हा कारभार आणि औरंगजबाचा कारभार एक सारखाच असल्याचं वक्तव्य मी काल केलं होतं. यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. औरंगजेब निश्चित क्रूर होता, आणि औरंगजेबाने स्वत:चा भाऊ दाराशिको याचा खून केला, त्यांचं धड दिल्लीत गाडलं. वडिलांना अटक केली. त्यामुळे औरंगजेब निश्चित क्रूर होता. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढंच फडणवीसांचं सरकार क्रूर आहे. हे माझं वक्तव्य होतं.

मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली आहे, ते मला समजलं नाही. मी काही चुकीचं बोललो नाही. मी काही फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. देवेंद्र फडणीसांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच त्यांच्यामध्ये फरक आहे, असं देखील मी बोललो नाही. मी शुद्ध स्वरुपामध्ये जो राज्यकारभार आहे तो अत्याचार आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं हे सरकार हाकत आहे, या संदर्भात माझी केलेली ही तुलना आहे.

माझी टीका ही राज्यकारभाच्या अनुषंगाने आहे. मात्र असं असताना कालपासून त्यांच्याच लोकांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. माझी तुलना ही राज्यकारभाराशी होती. मात्र भाजपमधील जी नेतेमंडळी आहेत ती सरसकट देवेंद्र फडणीस हे औरंगजेबासारखे होते असा जो कांगावा करत आहेत, याचाच अर्थ काय तर त्यांच्याच पक्षातील लोक फडणवीसांना औरंगजेब ठरू पाहात आहेत. असा घणाघात यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.