AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 किलोमीटर वेगाने वादळ, 17 राज्यात हाहाकार! आयएमडीचा मोठा इशारा, 72 तास..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. तब्बल 17 राज्य संकटात असल्याचे बघायला मिळतंय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल.

90 किलोमीटर वेगाने वादळ, 17 राज्यात हाहाकार! आयएमडीचा मोठा इशारा, 72 तास..
Hurricane
| Updated on: May 27, 2026 | 7:13 AM
Share

देशासमोर अत्यंत मोठा धोका आहे. अनेक राज्यात उष्णता वाढली आहे. उकाड्याने लोक हैराण झालीत. भारतीय हवामान विभागाने यादरम्यान एक मोठा इशारा जारी केला. आयएमडीनुसार, 27 मे 2026 रोजी 17 राज्यांमध्ये जोरदार वादळे, मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट होऊ शकतो. तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान काही राज्यांमध्ये ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारेही असेल. देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्यामध्येच आता हा मोठा इशारा वर्तवला आहे. तज्ज्ञांच्या मते, काही राज्यात उष्णता अजून वाढू शकते. पुढील 72 तास अत्यंत महत्वाची आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह भयंकर पाऊस झाला. 100 हून अधिक लोक या चक्रीवादळात ठार झाले. आजही होणाऱ्या पावसादरम्यान वादळाचा वेग खूप जास्त असेल.

विदर्भात उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. ब्रह्यपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज भारतीय हवामान विभागाने वर्धा, अमरावती आण चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा अलर्ट जारी करत रेड अलर्ट दिला. आजही या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर असेल. नागपूर, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका आता लहान मुलांच्या आरोग्यावर बसताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप, उलटी-जुलाब आणि न्यूमोनियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

अकोला जिल्ह्यात नवतपाच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढताना दिसत आहे. काल अकोल्याचे तापमान 45.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते, तर आज तापमान 44.1 अंशांवर पोहोचले आहे. दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत असून गरम वाफा आणि उष्ण वारे नागरिकांना त्रस्त करत आहेत. वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवरही नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक