AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात मोठा धोका, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, अलर्ट जारी, 24 तासात..

राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचाही मोठा इशारा देण्यात आला. राज्यावर दुहेरी संकट आहे.

विदर्भात मोठा धोका, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, अलर्ट जारी, 24 तासात..
Indian Meteorological Department
| Updated on: May 26, 2026 | 8:09 AM
Share

विदर्भात उष्णतेचा हाहाकार बघायला मिळत आहे. विदर्भात उष्णता काही कमी होताना दिसत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. विदर्भात दिवसासोबतच रात्रीही उष्णता वाढत आहे. वर्धा, अमरावती, चंदपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेसोबतच रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. काल विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. आज अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, बीड, धाराशिव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि लातूर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. एकीकडे उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. अशा जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा.

राज्यातील उष्णता वाढल्याने उष्णघाताच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच आजही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा थेट रेड अलर्ट जारी केला. मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा. आष्टी तालुक्यातील काही भागात मान्सून पुर्व पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागात पेरणी पुर्व शेती मशागतीला या पावसाचा चांगलाच फायदा होणार असल्याने शेतकरी थोडेसे समाधीनी झाले आहेत. आष्टी, बीड सांगवी भागात पावसाने हजेरी लावली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, त्यामुळे दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी होऊन उष्णता कमी झाली आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. आजही लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....