AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्यांची पुनर्वसन करण्याची वेळ… ठाकरे गटाच्या नेत्याचा तीन मंत्र्यांवर निशाणा

Unmesh Patil: मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही.

मंत्र्यांची पुनर्वसन करण्याची वेळ... ठाकरे गटाच्या नेत्याचा तीन मंत्र्यांवर निशाणा
Unmesh Patil
| Updated on: Jul 11, 2024 | 12:38 PM
Share

भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर घणाघाती हल्ला केला. या तीन मंत्र्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे. लबाड मंत्र्यांची फौज आहे. जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक आहेत. ते दूध उत्पादकांना भाव देत नाही. त्यांना लाजा वाटत नाही, असा हल्ला उन्मेष पाटील यांनी चढवला.

मंत्री गिरीश महाजन यांची मातीशी नाळ राहिलेली नाही. त्यांना पैसांची मस्ती आली आहे. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांशी नाळ तोडलेली आहे. मंत्री मदत व पुनवर्सन अनिल पाटील त्यांची ना मदत मिळते ना त्यांच्याकडून पुनर्वसन केले जाते. त्यामुळे त्यांचेच पुर्नवसन करण्याची वेळ आली आहे. गुलाबराव पाटील म्हणत होते, शेतकऱ्यांसाठी शिंगाडा मोर्चा काढणार. पण आता सोंग करुन बसले आहेत, आता त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या कळत नाही. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे, लबाड मंत्र्यांची फौज आहे.

जळगाव जिल्ह्यात कोणी वाली नाही

राज्यातील नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन स्वत:ला समजून घेतो. मात्र त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही. ज्वारीचे खरेदी केंद्र नाही. जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे प्रशासन ऐकत नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याला कुणीही वाली राहिलेले नाही, यांच्यात एकाचीही उत्तर देण्याची हिमंत नाही. या शब्दात उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली आहे.

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही. केवळ सामाजिक तेढ निर्माण करुन राजकीय भाजता येईल का? हा या भाजपचा चेहरा आता उघड झाला आहे. देवेंद्र फडवणीस असो की गिरीश महाजन यांचा चेहरा उघडा पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडी लढा देईल. तुम्ही लोकांना न्याय देवू शकत नसाल तर खुर्च्या खाली करा, असे उन्मेष पाटील यांनी म्हटले.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.