AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्यांची पुनर्वसन करण्याची वेळ… ठाकरे गटाच्या नेत्याचा तीन मंत्र्यांवर निशाणा

Unmesh Patil: मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही.

मंत्र्यांची पुनर्वसन करण्याची वेळ... ठाकरे गटाच्या नेत्याचा तीन मंत्र्यांवर निशाणा
Unmesh Patil
| Updated on: Jul 11, 2024 | 12:38 PM
Share

भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर घणाघाती हल्ला केला. या तीन मंत्र्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे. लबाड मंत्र्यांची फौज आहे. जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक आहेत. ते दूध उत्पादकांना भाव देत नाही. त्यांना लाजा वाटत नाही, असा हल्ला उन्मेष पाटील यांनी चढवला.

मंत्री गिरीश महाजन यांची मातीशी नाळ राहिलेली नाही. त्यांना पैसांची मस्ती आली आहे. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांशी नाळ तोडलेली आहे. मंत्री मदत व पुनवर्सन अनिल पाटील त्यांची ना मदत मिळते ना त्यांच्याकडून पुनर्वसन केले जाते. त्यामुळे त्यांचेच पुर्नवसन करण्याची वेळ आली आहे. गुलाबराव पाटील म्हणत होते, शेतकऱ्यांसाठी शिंगाडा मोर्चा काढणार. पण आता सोंग करुन बसले आहेत, आता त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या कळत नाही. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे, लबाड मंत्र्यांची फौज आहे.

जळगाव जिल्ह्यात कोणी वाली नाही

राज्यातील नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन स्वत:ला समजून घेतो. मात्र त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही. ज्वारीचे खरेदी केंद्र नाही. जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे प्रशासन ऐकत नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याला कुणीही वाली राहिलेले नाही, यांच्यात एकाचीही उत्तर देण्याची हिमंत नाही. या शब्दात उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली आहे.

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी खेळायचे असा उपक्रम राज्यात सुरु आहे. आदिवासी कोळी समाजामध्ये भांडण लावायचे तर धनगर समाजाला एसटी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायची मात्र अंमलबजावणी करायची नाही. केवळ सामाजिक तेढ निर्माण करुन राजकीय भाजता येईल का? हा या भाजपचा चेहरा आता उघड झाला आहे. देवेंद्र फडवणीस असो की गिरीश महाजन यांचा चेहरा उघडा पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडी लढा देईल. तुम्ही लोकांना न्याय देवू शकत नसाल तर खुर्च्या खाली करा, असे उन्मेष पाटील यांनी म्हटले.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.