AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीचं हे पांढरं विष शिवारातून उचलून फेका, मायबाप सरकार काहीतरी करा, शेतकऱ्यांची केविलवाणी हाक

धाराशिव व उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झाले.

अवकाळीचं हे पांढरं विष शिवारातून उचलून फेका, मायबाप सरकार काहीतरी करा, शेतकऱ्यांची केविलवाणी हाक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2023 | 11:15 AM
Share

संतोष जाधव, धाराशिव: 40 तास उलटून गेले. काळ्या भुईवर हे पांढरं विष पडलंय. गारा नव्हेत हे विषच आहे, उभ्या पिकांना खाल्लं, अजूनही जमिनीत जिरेना, कुणीतरी या.. हे पांढरं विष शिवारातून उचलून फेका, शेताची ही अवस्था आता पहावंना…  अशी आर्त हाक विनवणी शेतकरी करीत आहेत. धाराशिव (Dharashiv) धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकासह आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 40 तास उलटून गेले तरी गारांचा खच तसाच आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Dharashiv

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी व गारपितने ज्वारी नुकसान झाले आहे. शिराढोण, वाडी बामणी, केशेगाव, बोरी या भागात मोठे नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर शेतातील उभी पिके वाढणार नसल्याने ती काढून टाकावी लागणार आहेत. शेत जमिनी पुन्हा नीट करण्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे त्यातच मजुरीचे दर वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पंचनामे सुरु केले आहेत तर काही भागात अजून सुरु झाले नाहीत. सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

‘अयोध्या दौऱ्याऐवजी मदत करा…’

टरबूज, आंबा, ड्रॉगन फ्रुट यासह ऊस, ज्वारी हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन अद्याप एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी आला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्या दौरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी अशी हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.. धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे व गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली आहे. या पावसाचा 71 गावांना फटका बसला असुन 38 घरांची पडझड झाली आहे तर 3 नागरिक जखमी झाले आहेत.

काल दिवसभरात केलेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांच नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताना पाठविला आहे. आजही दुसऱ्या दिवशी पंचनामे सुरु आहेत.

धाराशिव व उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झाले.

20 मोठी व 900 कोंबडी पिल्ले दगावली आहेत. जिरायत क्षेत्र 1 हजार 74 हेक्टर, बागायत क्षेत्र 835 हेक्टर व फळबागांचं 662 हेक्टर परिसरात नुकसान झालंय.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.