AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध

पूर्ण लॉकडाऊनची शक्यता आपण नाकारत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 02, 2021 | 9:23 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती विदारक बनली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतेय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक इशारा दिला आहे. राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही, असं काही मंत्री सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र पूर्ण लॉकडाऊनची शक्यता आपण नाकारत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. (decision about lockdown in the state will be taken in the next two days)

2 दिवसांत लॉकडाऊन निर्णय होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं. येत्या दोन दिवसांत मी विविध राजकीय पक्ष, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आदी लोकांशी चर्चा करणार आहे. लॉकडाऊन नको कर अन्य उपाय काय? याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांच्याकडून उपाय मिळाला नाही आणि दोन दिवसांत राज्यातील कोरोनाचं नेमकं चित्र काय समोर येतं हे पाहून येत्या 48 तासांत नवे निर्बंध लावण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

..तर आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल – मुख्यमंत्री

राज्यात आता प्रत्येक दिवसाला 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णसंख्येचा आकडा असाच वाढत राहीला तर येत्या 10 ते 15 दिवसांत सध्या असलेली यंत्रणा अपुरी पडणार आहे. रुग्णालये, बेड्सची संख्या वाढवता येईल. पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. ते ही हाडा-मांसाची माणसं आहेत. अशावेळी लोकांनीच जबाबदारी ओळखून शिस्त पाळणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

आता रस्त्यावर उतराच!

राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलंय.

संबंधित बातम्या :

Uddhav Thackeray speech highlights : आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय

Maharashtra second Lockdown : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात निर्बंध लागणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

decision about lockdown in the state will be taken in the next two days

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.