AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं, कारण…, फडणवीसांचं मोठं विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.   मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं, कारण..., फडणवीसांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 5:50 PM
Share

मंगळवारी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.   मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात. शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही आदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत. आणि त्यांना जर मुख्यमंत्रिपद दिलं तर ते सेफ असतं, कारण ते परत करतात, आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात, हे मला माहिती असल्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे -पुढे पाहिलेलं नाहीये, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले, त्याचा आनंद आहे, असा खोचक टोला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. हे चांगलं आहे, विरोधी पक्षांचं ते कामच आहे. पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत, याचा मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वीच सांगितंल आहे, विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा, अन् हजार रुपये मिळवा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक