AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला मात्र फारसा फायदा झालेला नाही. यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?
devendra fadnavis and raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 17, 2026 | 5:58 PM
Share

BMC Election Result Devendra Fadnavis : राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या महापालिकांता आता महायुतीचा महापौर बसणार आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महत्त्वाच्या पालिकांत भाजपाचा महापौर होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज टाकरे हे दन्ही ठाकरे बंदू एकत्र आले होते. या युतीचा उद्धव ठाकरेंना चांगला फायदा झाला असून राज ठाकरे यांना मात्र विशेष फायदा झालेला नाही. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. या विधानानंतर फडणवीस यांनी केलेल्या जुन्या भाकिताचीही आठवण केली जात आहे.

मनसेला मिळाल्या फक्त 6 जागा

मुंबई तसेच इतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या दोन्ही भावांनी मुंबईत एकत्र येत झंझावाती प्रचार केला होता. विशेष म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या सभांना हजरोंनी गर्दी होत होती. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी प्रचार केला. मुंबईतील मराठी पट्ट्यात त्याचा फायदाही झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी साधारण 58 नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. परंतु या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी करत मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांनी 66 जागांवर विजय मिळवला तर राज ठाकरे यांना फक्त 6 जागांवर विजयी होता आले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी ठाकरे बंंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंचा फायदा होईल. परंतु राज ठाकरे यांना कोणताही फायदा होणार नाही, असे सांगितले होते. आकड्यांकडे पाहता फडणवीसांचे भाकित खरे ठरल्याचे दिसते.

मी अगोदरच सांगितलं होतं की…

याच भाकिताविषयी विचारले असता, फडणवीस म्हणाले की, मी अगोदरच सांगितलं होतं की मनसेला त्या युतीचा फायदा होणार नाही. त्या युतीमध्ये सर्वात मोठे अपयश हे मनसेला येईल, असे मी म्हणालो होतो. माझं भाकित या निवडणुकीत खरं ठरलं आहे. मनसेला किंवा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीला फायदा झालेला नाही. यासह उद्धव ठाकरे यांना मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीचा फायदा झालेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.