AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला मात्र फारसा फायदा झालेला नाही. यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?
devendra fadnavis and raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 17, 2026 | 5:58 PM
Share

BMC Election Result Devendra Fadnavis : राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या महापालिकांता आता महायुतीचा महापौर बसणार आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महत्त्वाच्या पालिकांत भाजपाचा महापौर होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज टाकरे हे दन्ही ठाकरे बंदू एकत्र आले होते. या युतीचा उद्धव ठाकरेंना चांगला फायदा झाला असून राज ठाकरे यांना मात्र विशेष फायदा झालेला नाही. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. या विधानानंतर फडणवीस यांनी केलेल्या जुन्या भाकिताचीही आठवण केली जात आहे.

मनसेला मिळाल्या फक्त 6 जागा

मुंबई तसेच इतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या दोन्ही भावांनी मुंबईत एकत्र येत झंझावाती प्रचार केला होता. विशेष म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या सभांना हजरोंनी गर्दी होत होती. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी प्रचार केला. मुंबईतील मराठी पट्ट्यात त्याचा फायदाही झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी साधारण 58 नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. परंतु या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी करत मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांनी 66 जागांवर विजय मिळवला तर राज ठाकरे यांना फक्त 6 जागांवर विजयी होता आले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी ठाकरे बंंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंचा फायदा होईल. परंतु राज ठाकरे यांना कोणताही फायदा होणार नाही, असे सांगितले होते. आकड्यांकडे पाहता फडणवीसांचे भाकित खरे ठरल्याचे दिसते.

मी अगोदरच सांगितलं होतं की…

याच भाकिताविषयी विचारले असता, फडणवीस म्हणाले की, मी अगोदरच सांगितलं होतं की मनसेला त्या युतीचा फायदा होणार नाही. त्या युतीमध्ये सर्वात मोठे अपयश हे मनसेला येईल, असे मी म्हणालो होतो. माझं भाकित या निवडणुकीत खरं ठरलं आहे. मनसेला किंवा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीला फायदा झालेला नाही. यासह उद्धव ठाकरे यांना मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीचा फायदा झालेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा