AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे…

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे... तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे...
ADITYA THACKERAY AND DCM DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 21, 2023 | 6:04 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी मातोश्री रश्मी ठाकरे यांच्या दिशेने बोट दाखविले होते. अशातच विधानसभेतही आज एका लक्षवेधीच्या अनुषंगाने लग्नाचा विषय निघाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिला. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही ही तुमच्यासोबत येण्यासाठी ही राजकीय धमकी तर नाही ना असा सवाल करत गुगली टाकली.

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील जुने वीज निर्मिती प्रकल्प, आपत्कालीन परिस्थितीत होणारा वापर आणि त्यामुळे उद्भवणारे प्रश्न असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

आमदार बच्चू कडू यांनी यावर उपप्रश्न विचारताना कोणताही प्रकल्प सुरु झाला की २५ ते ३० टक्के काम झाल्यानंतर तो बंद केला जातो. प्रकल्पाचे काम सुरु झाले की अनेक कामगार आपले गाव सोडून येथे येतात. पण, वर्ष दोन वर्षातच प्रकल्पाचे काम बंद पडते. त्यामुळे कामगार बेरोजगार होतात. त्या कामगारावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब कोलमडून पडते.

राज्यात कोणत्याही प्रकल्पाची गुंतवणूक करताना तेथील कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल याचे धोरण आखण्यात यावे. म्हणजे लग्न कामगाराने केले आता लग्न तुटले. त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लग्न तुटले तरी ते सरकारने लावायचे आणि पुढची जबाबदारीही सरकारनेच घ्यायची, असेच आमचे धोरण असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि नागपूरमध्ये वीजप्रकल्पांतून निघणाऱ्या राखेच्या तलावाशी संबंधित उपप्रश्न विचारले. नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात ७०० ते ८०० राखेचे तलाव आहेत. असे अनेक ठिकाणी राखेचे तलाव आहेत. त्यामुळे प्रदूषण तयार होत असून हे तलाव मोकळे करणार का? असा प्रश्न विचारला.

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे… तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली टाकली. त्यांच्या या गुगलीवर विधानसभा अध्यक्ष यांनी आधी लग्न कोंडाण्याचे… असे म्हणत आणखी हास्यबॉम्ब फोडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… एखाद्याचे तोंड बंद करायचे असले तर हाच उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. हे मी अनुभवातून सांगत आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?