AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे…

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे... तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे...
ADITYA THACKERAY AND DCM DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 21, 2023 | 6:04 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी मातोश्री रश्मी ठाकरे यांच्या दिशेने बोट दाखविले होते. अशातच विधानसभेतही आज एका लक्षवेधीच्या अनुषंगाने लग्नाचा विषय निघाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिला. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही ही तुमच्यासोबत येण्यासाठी ही राजकीय धमकी तर नाही ना असा सवाल करत गुगली टाकली.

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील जुने वीज निर्मिती प्रकल्प, आपत्कालीन परिस्थितीत होणारा वापर आणि त्यामुळे उद्भवणारे प्रश्न असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

आमदार बच्चू कडू यांनी यावर उपप्रश्न विचारताना कोणताही प्रकल्प सुरु झाला की २५ ते ३० टक्के काम झाल्यानंतर तो बंद केला जातो. प्रकल्पाचे काम सुरु झाले की अनेक कामगार आपले गाव सोडून येथे येतात. पण, वर्ष दोन वर्षातच प्रकल्पाचे काम बंद पडते. त्यामुळे कामगार बेरोजगार होतात. त्या कामगारावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब कोलमडून पडते.

राज्यात कोणत्याही प्रकल्पाची गुंतवणूक करताना तेथील कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल याचे धोरण आखण्यात यावे. म्हणजे लग्न कामगाराने केले आता लग्न तुटले. त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लग्न तुटले तरी ते सरकारने लावायचे आणि पुढची जबाबदारीही सरकारनेच घ्यायची, असेच आमचे धोरण असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि नागपूरमध्ये वीजप्रकल्पांतून निघणाऱ्या राखेच्या तलावाशी संबंधित उपप्रश्न विचारले. नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात ७०० ते ८०० राखेचे तलाव आहेत. असे अनेक ठिकाणी राखेचे तलाव आहेत. त्यामुळे प्रदूषण तयार होत असून हे तलाव मोकळे करणार का? असा प्रश्न विचारला.

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे… तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली टाकली. त्यांच्या या गुगलीवर विधानसभा अध्यक्ष यांनी आधी लग्न कोंडाण्याचे… असे म्हणत आणखी हास्यबॉम्ब फोडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… एखाद्याचे तोंड बंद करायचे असले तर हाच उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. हे मी अनुभवातून सांगत आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...