AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra modi: पंडित नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत सर्वांचा आरक्षणास विरोध…नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर मोठा आरोप

Narendra modi speech in Dhule: काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही. बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये कायम राहणार आहे.

Narendra modi: पंडित नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत सर्वांचा आरक्षणास विरोध...नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर मोठा आरोप
नरेंद्र मोदी, धुळे
| Updated on: Nov 08, 2024 | 1:16 PM
Share

Narendra modi speech in Dhule: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. धुळ्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचा आता जातींमध्ये भांडणे लावण्याचा कट

काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत आहे. काँग्रेस यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. छोट्या जाती एकत्र राहिल्या तर त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे मी म्हणतो, एक आहे तर सुरक्षित आहे. आम्ही एकजुट राहून काँग्रेसचा खेळ उधळून लावायचा आहे.

महात्मा गांधी यांनी म्हटले होते…

विकासाचा नावावर आम्हाला पुढे जायाचे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी काँग्रेसचे विसर्जन करु इच्छित होते. त्यांना काँग्रेसमधील आजार माहीत होता. काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. काँग्रेसने ७५ वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. देशात दोन राज्यघटना होत्या. परंतु मोदी आला आणि त्यांनी देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू केली. काँग्रेस पुन्हा आता जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. काँग्रेस आघाडी त्या ठिकाणी पुन्हा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. हे देश आता स्वीकारणार नाही.ट

काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही. बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये कायम राहणार आहे. महायुती तुमच्या परिवारासाठी काम करत राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा…

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.