अवकाळी आला आणि सगळच घेऊन गेला,; आता पंचनामे होणंही झालं अवघड…

वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी आला आणि सगळच घेऊन गेला,; आता पंचनामे होणंही झालं अवघड...
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:37 PM

धुळे : महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळेही शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेलं उभं पीक अवकाळी पावसामुळे मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच परिस्थितीत दुसऱ्यांदा धुळे जिल्ह्यावर ओढावली आहे. धुळे जिल्ह्याला आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतीचे नुकसान होऊनही त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना शासनाचे अधिकारी आहेत ना कोणते पथक आहे.  त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई मागायची कुणाकडे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात असणारी उभी पिकं भूईसपाट झाली आहेत.

शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही आता शासकीय कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्यामुळे आता झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसामुळे दुसऱ्यांदा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्याने त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे.

वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला असला तरी आणि प्रचंड नुकसान झाले असले तरी आता या नुकसानीचे पंचनामे करणार कोण असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

जुनी पेन्शन योजनेसाठी सगळे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असल्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे होणार की नाही असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.