AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…अशी वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा; ठाकरे गटाचा नेता थेट बोलला

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

'...अशी वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही', एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा; ठाकरे गटाचा नेता थेट बोलला
Image Credit source: ANI
| Updated on: Jan 21, 2025 | 2:51 PM
Share

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र त्यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. ते पुन्हा एकदा आपल्या मुळगावी दरे इथे गेले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दुसरीकेड पालकमंत्रिपदावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजीनाट्य सुरू झाल्याचं समोर येत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी महायुती सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले सचिन अहिर? 

राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी की अर्थकरणासाठी यांना पालकमंत्रिपद कशासाठी हव आहे असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, असं दिसत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागला. अधिवेशनाच्या एक दिवस आधी खातेवाटप झालं. पालकमंत्री पद मिळाले नाही, म्हणून स्थगिती देण्याची वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही. या सर्व प्रकरणामधून सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न पडतोय, असं अहिर यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री पदासाठी एवढी चुरस का आहे?  रस्त्यावर उतरू, राजीनामा देऊ, बघून घेऊ अशी यांची भाषा आहे. मंत्री पदापेक्षा पालकमंत्री पदामुळे काय अडलं आहे. हा संशोधनाचा भाग आहे. राजकीय वर्चस्व निर्माण करायचं आहे, की अर्थकारण करण्यासाठी यांना पालकमंत्री पद हवंय?  आमच्या सरकारच्या काळात पालकमंत्री पदासाठी नाराजी झाली नाही. सत्तेसाठी हे सुरू आहे, असा टोला अहिर यांनी लगावला आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, यावर देखील अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. काही नसताना त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी दिली तेव्हा सर्व नेते चांगले होते. एकनाथ पवार संकुचित विचार करणारे आहेत. त्यांनी संयम ठेवायला हवा होता.  त्यांनी टीका करू नय, असं अहिर यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.