AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस…रामदास कदमांचं सर्वात मोठं विधान, त्या दाव्याने राज्यभर खळबळ!

शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याा निधनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस...रामदास कदमांचं सर्वात मोठं विधान, त्या दाव्याने राज्यभर खळबळ!
balasaheb thackeray and ramdas kadam
| Updated on: Oct 02, 2025 | 8:43 PM
Share

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडा. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आले होते. या मेळाव्यात शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? याचा तपास करावा , अशी खळबळजनक मागणी रामदास कदम यांनी केली आहे. त्यांच्या या विधानांची आता राज्यभर चर्चा होत आहे.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर काही विधानं केली. “शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे,” असे रामदास कदम आपल्या भाषणात म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.

मृत्युपत्रात नेमकी कोणाची सही होती?

पुढे बोलताना, “मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती,” असे विधान रामदास कदम यांनी केले. यापुढेही जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्युपत्र कोणी केलं? हे मृत्युपत्र कधी झालं? त्यात सही कोणाची होती? असा सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढावी, अशी खळबळजनक मागणीही रामदास कदम यांनी केली.

तुम्ही सर्वांनाच संपवलं, कारण काय होतं?

पुढे बोलताना तुम्ही आम्हाला काय शिकवता, शिवसेना आम्ही मोठी केली. आम्ही तुरुंगात गेलो. तुम्ही आम्हालाच संपवताय. तुम्ही मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, रामदास कदम यांना संपवले. ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले, असा हल्लाबोलही कदम यांनी ठाकरे यांच्यावर केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...