मुंबई, ठाणे कोणाचे ? कोणाचा डंका वाजणार ?
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजितदादा गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागातच शिवसेना वाढली. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाल्याने दोन्ही पक्षांसाठी ही विधानसभा निवडणूक कसोटीची ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीने अनेक लोकप्रिय घोषणांची बरसात केलेली आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकात महायुतीला फटका बसल्याने महायुतीने लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना आणल्या आहेत. महायुतीतील तिन्ही गट भाजपा, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या योजनेचे श्रेय घेऊन प्रचाराला लागले आहेत. तर मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने या योजनांवर टीका करीत मतांसाठी ही योजना असल्याचे म्हटले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण कोणाचे ? महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी एकट्या मुंबईत...
