AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनं मागासवर्गीय सोयी सुविधा संपवल्या : नितीन राऊत

भाजपने मागासवर्गीयांच्या सोयी-सुविधा संपवल्या, असा घणाघाती आरोप राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

भाजपनं मागासवर्गीय सोयी सुविधा संपवल्या : नितीन राऊत
नितीन राऊत
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Dec 19, 2020 | 2:31 PM
Share

नागपूर : भाजपने (BJP) मागासवर्गीयांच्या सोयी-सुविधा संपवल्या, असा घणाघाती आरोप (Nitin Raut Criticize BJP) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. ते आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर अनेक टिकास्त्र सोडले. त्याशिवाय, काँग्रेसने (Congress) सत्तेत असताना जनहिताचे अनेक निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले (Nitin Raut Criticize BJP).

केंद्रातील भाजप सरकारने दलित, मागास समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला : नितीन राऊत

2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं होतं. संविधानाची शपथ घेऊन ते पंतप्रधान झाले. धर्मनिरपेक्षता या शब्दाला मोदींनी पंथनिरपेक्षता असं करण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील भाजप सरकारने अनुसुचीत जाती जमातीच्या लोकांच्या जीवन अधोगतीकडे नेली. विशिष्ट वर्ग सोडल्यास भाजप सरकारच्या धोरणांचा सामान्यांना फटका बसला, असा आरोप नितीन राऊतांनी केला.

लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी मुस्लीम हिताचा निर्णय घेतला. भाजपचे नेते वरवर विकासाच्या बाता मारत असतात, पण त्यांनी मागास, दलित समाजाच्या विकासाचा मार्ग रोखला, दलित प्रशासकीय अधिकारी सचिव व्हायला लागले ते भाजपला आवडलं नाही. एससी समाजातील शिक्षित झाले, त्यांना रोजगार मिळून नये, असा भाजपचा कार्यक्रम, केंद्रातील भाजप सरकारने दलित, मागास समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले

मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने खुप गवगवा केला, तत्कालीन भाजप सरकारने योग्य पद्धतीनं मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडली नाही. शिष्यवृत्ती थांबवली, मागासवर्गीय आणि दलित समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, सरसंघचालकांनी आरक्षणावर पुनर्विचार व्हावा, असं वक्तव्य केलं होतं

महाविकास आघाडी सरकारने सर्व समाजाच्या विकासाचे मुद्दे हाती घेतले : नितीन राऊत

महाविकास आघाडी सरकारने सर्व समाजाच्या विकासाचे मुद्दे हाती घेतले. मागास आणि दलीत समाजाच्या विकासाची पावलं महाविकास आघाडी सरकारने उचलले. याबाबतच सोनिया गांधी (Sonia Gandhi Letter To CM) यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं.

सोनिया गांधी यांचे क्रांतीकारी : नितीन राऊत

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरला. सोनिया गांधी यांचे क्रांतीकारी पत्र आहे. या पत्राने काँग्रेसचा आगामी निवडणूकीत काय अजेंडा असेल हे दिसून येते.

सोनिया गांधी यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

– लोकसंख्येनुसार मागास आणि दलीत वर्गासाठी निधीचं वाटप

– मागास आणि दलीत युवकांना सरकारी कंत्राट मिळावे

– सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुशेष भरताना कालबद्ध कार्यक्रम राबवावा

– शिक्षण तंत्रशिक्षण किंवा कैशल्यविकास कार्यक्रमाच मागास आणि दलीत युवकांचे कौशल्यविकास करावे

सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रातील सुचना मागास, दलित समाजाच्या हितासाठी आवश्यक आहेत. सोनिया गांधी यांच्या सूचना ठाकरे सरकारला मार्गदर्शक ठरणार आहेत.

अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पत्र : नितीन राऊत

राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वःताकडे बघावं, सर्वात जास्त ॲट्रॅासीटीच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात आहेत. कॅामन किमान प्रोग्राम ठरला होता. वरिष्ठ मंडळी नेहमी आठवण करुन देतात. सोनिया गांधींच्या पत्राने ठाकरे सरकारला ती आठवण करुन दिली. राज्यात सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं. त्यामुळे किमान समान अजेंड्यावर काम करत असताना अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पत्र लिहलं. शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा असे पत्र लिहत असतात, त्यामुळं याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं (Nitin Raut Criticize BJP).

13 महिन्यात किमान समान कार्यक्रमावर काय केलं?

राज्यावर कोरोनावर संकट आहे, राज्य सरकारने कोरोना महामारित चांगलं काम केलं. कोरोना काळात ठाकरे सरकारने चांगलं काम केलं. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालं ते हाताळण्यात राज्य सरकारने चांगलं काम केलं. हे काम किमान समान कार्यक्रमावर आधारीतच आहे. भाजपने दलित आदिवासींच्या हिताचे कार्यक्रम बंद केले होते, त्यामुळे सोनीया गांधी यांना पत्र लिहिण्याची वेळ आली.

शिवसेनेला या पत्राने टेन्शन आलेलं नाही : नितीन राऊत

शिवसेनेला या पत्राने टेन्शन आलं नाही, पण कुठतरी गांभीर्य आलंय. पुढील बजेटमध्ये यावर विचार होईल. सोनिया गांधीच्या पत्रावर कोअर कमिटीत चर्चा होईल. कोअर कमिटीत नवाब मलिक नाही. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील आहेत, त्यात यावर विचार होईल.

Nitin Raut Criticize BJP

संबंधित बातम्या :

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, एकहाती निर्णय घेते; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

महाविकास आघाडी सरकार गॅसवर; आशिष शेलार यांचा दावा

सोनियांचा लेटरबाँब नाही, संवाद; पत्रावर तिन्ही पक्षांची सारवासारव?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा