Maharashtra Budget 2026-27 : चौथी मुंबई विकसित करणार… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत मोठी घोषणा; कुठे होणार ही चौथी मुंबई ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या 2027 च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 'चौथी मुंबई' (Vadhavan) विकसित करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच 20 लाख झोपडपट्टी घरांचे पुनर्वसन आणि 10 लाख परवडणाऱ्या घरांची योजना प्रमुख आहे. मुंबई आणि पुणे शहरांसाठी भुयारी मार्ग, 1200 किमी मेट्रो आणि 6000 किमी द्रुतगती मार्ग प्रकल्पांवर भर दिला आहे. यामुळे राज्याच्या पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला गती मिळणार आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज मुख्यमंत्री देवेंद्व फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.28 जानेवारी रोजी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजि पवार यांचे निधन झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी अर्थखात्याची धुरा सांभाळली. आजचा अर्थसंकल्पही त्यांनीच सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरूवातीलच त्यांनी अजित पवार यांची आठवण जागवत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यानंतर मुख्य भाषणाला सुरुवात करताना मु्ख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.
यावेळी त्यांनी चौथ्या मुंबईबद्दलही महत्वाची घोषणा केली. नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करण्यात आहे. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 सालापर्यंत पूर्ण करणार आहे. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.
चौथी मुंबई विकसित करणार..
चौथी मुंबई वाढवण येथे विकसित होणार आहे. एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार,असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. 2029 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील.
मुंबई-पुण्यासाठी काय घोषणा ?
– मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्ग तयार करणार. गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाचं काम अंतिम स्तरावर आहे. ठाणे ते मुलुंड भुयारी मार्ग जून 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर खारघर ते तुर्भे लवकर पूर्ण होईल.
– मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल. तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
– ऐरोली ते कटई नाका भाग तीनचे काम पूर्ण होत आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बनवणार.
– अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार
– मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार . अटल सेतूला नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उलवे किनारी प्रकल्प पूर्ण करणार.
