AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ

नांदेड- हैद्राबाद या हायवेवर ताजा आणि थेट शेतकरी भाजीपाला विक्रीला बसलेला पाहून ग्राहकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. | Farmers

शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ
| Updated on: Feb 16, 2021 | 11:06 AM
Share

नांदेड: कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याचे आपण पाहिलं. मात्र नांदेड जिल्ह्यातील वाका इथल्या शेतकऱ्यांनी संकटात संधी निर्माण केल्याचे काम केलंय. वाका गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला कोरोना काळात शहरात कवडीमोल दराने विकल्या जात होता. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावाशेजारी असलेल्या हायवेवर भाजीपाल्याचा बाजार भरवला. (Farmers started own market in Nanded)

नांदेड- हैद्राबाद या हायवेवर ताजा आणि थेट शेतकरी भाजीपाला विक्रीला बसलेला पाहून ग्राहकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी हायवेवर सुरू केलेला बाजार आताही सुरू असून या बाजारात रोज शेकडो ग्राहक खरेदी करतायत. त्यातून गावाच्या शेजारीच शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या या बाजाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामीण जीवनातला उत्साह परतणार; पुण्यातील लहान यात्रा-जत्रा पुन्हा सुरु होणार

राज्याच्या ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या यात्रा आणि जत्रा (Jatra) पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पुणे जिल्ह्यात प्रशासनाने लहान यात्रा आणि जत्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Yatra and Jatra will start in Pune region)

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव येतील तसे छोट्या यात्रांना परवानगी दिली जाणार आहे. स्थानिक महानगरपालिका आणि प्रशासनाने तशी परवानगी द्यावी, अशा सूचना सौरभव राव यांनी दिल्या आहेत.

मोठ्याप्रमाणावर गर्दी होणाऱ्या जत्रा आणि यात्रांसाठी विभागीय कार्यालयाची परवानगी आवश्यक असेल. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विभागीय कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र, छोट्या यात्रा व जत्रांना तशा परवानगीची गरज नाही, असे विभागीय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे अनेक गावांमधील जत्रा व यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. या उत्सवांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते. जत्रांच्या काळात ग्रामीण भागांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. मात्र, कोरोनामुळे वर्षभर हे सर्व ठप्प होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यापुरता का होईना ग्रामीण जीवनातील हा उत्साह पुन्हा परतणार आहे.

(Farmers started own market in Nanded)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.