एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होण्याची भीती, रोहित पवारांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली आहे की, जवळपास एक कोटी 76 लाख मतदार जे आहेत, ते एसआयआरच्या प्रक्रियेमधून वगळणार आहेत. परंतु त्यांना पुन्हा एकदा फॉम नंबर 6 भरून मतदार होण्याची संधी निवडणूक आयोग देणार आहे, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता, यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होण्याची भीती आहे. एक तुम्ही समजून घ्या, फॉम सहा हा जो फॉम आहे, तो रेग्यूलर फॉम असतोच. 2024 साली जे लोकसभेचं इलेक्शन झालं, तेव्हा महाराष्ट्रात लाखो मतदार वाढले होते, फॉम 6 च्या माध्यमातून अचानक वाढले अन् अचानक डिलिट सुद्धा झाले. त्यावर आम्ही सादरीकरण देखील केलं होतं, तो मुद्दा आम्ही मांडला होता. एकाच खोलीमध्ये हजार लोक राहतात असं तिथे दाखवण्यात आलं होतं. मतदान झाल्यानंतर त्यातील एकही मतदार सापडला नाही, फॉम 6 चा वापर करून, निवडणुकीच्या आधी अनाधिकृतपणे मतदार वाढवले जातात. त्यामुळेच आमचा फॉम 6 वर अक्षेप आहेत, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ते फॉम 6 चा वापर करून निवडणूक आयोग मतदारांच्या नोंदी कशा करणार हे आम्ही समजून घेणार आहोत. आमचं म्हणणं आहे की, विधानसभा, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी असताना एवढा खटाटोप कशासाठी? एवढ्याच दिवसात झालं पाहिजे, तेवढ्याच दिवसांमध्ये झालं पाहिजे. टार्गेट दिल्यामुळे हे बिएलओ त्यामध्ये नको ती कामे करत आहेत. हे कुठेतरी लोकशाहीला धोकेदायक होऊ शकतं. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे, तो देखील जाऊ शकतो. हे आमचं सर्वांचं मत आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
