AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य चालू

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य चालू
raigad boat accident
| Updated on: Aug 21, 2025 | 2:57 PM
Share

Raigad Boat Accident : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

समुद्राचे पाणी शिरल्याने बोट थेट बुडाली

मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे. या बोटीचा आता शोध घेतला जात आहे. ही बोट अजूनही मिळालेली नाही. समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये काही मच्छीमार होते. या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

सात प्रवाशांना वाचवण्यात आलं यश

समुद्रात बुडालेल्या या बोटीत एकूण सात खलाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या खुलाशांना वाचवण्यात येश आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला.

बंदी असताना मच्छीमार जातायत समुद्रात

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली होती. या बोट दुर्घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला होता तर सहा जाणांना वाचवण्यात यश आले होते. सध्या समुद्र उधाणलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत माच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. मात्र तरीदेखील आदेश झुगारून काही मच्छीमार मासे पकडायला समुद्रात जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत काय दिसत आहे?

उरणमधील बोट दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाताना दिसत आहे. तर काही लोक लाईफ जॅकेट परिधान करून दुर्घटनाग्रस्त बोटीतील मच्छीमारांना वाचवताना दिसत आहेत. सध्या सर्व सात खलाशांना वाचवण्यात येश आले ाहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?