NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ((Nashik Rain) वालदेवी (Valdevi river) नदीला पूर (Flood in Nashik) आला आहे. पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने एक जण वाहून गेला. दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने नदीकाठच्या (Godakath) गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा
धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू.
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 11:01 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने (Nashik Rain) वालदेवी (Valdevi river) नदीला पूर (Flood in Nashik) आला आहे. पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने एक जण वाहून गेला. दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने नदीकाठच्या (Godakath) गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (Flood in Nashik district, one person was swept away in Valdevi river, a warning to the citizens of Godakath)

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणाची पाणी पातळी 96.82 तर दारणा धरणाची पाणी पातळी 97.10 वर पोहचली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पालखखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स पाणी सोमवारी (13 सप्टेंबर) आठ वाजता सोडण्यात आले. पावसाने वालदेवी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाढेगाव येथील वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय 45) हे वाहून गेले आहेत. ते सायंकाळच्या सुमारास पुलावरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. येथून दाढेगाव, पाथर्डी, व पिंपळगाव खांब येथील नागरिकांची ये-जा सुरू असते. नदीचे पाणी वाढल्यास दाढेगावकडे जायचा मार्ग बंद होतो. त्यामुळे येथे नवा पूल उभारावा. तो उंच असावा, अशी मागणी तिन्ही गावातल्या गावकऱ्यांकडून होत आहे.

रामकुंड, गोदाघाटवरील दुकाने हलविली गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले आहे. त्यामुळे गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पोहण्यासाठी मुलांची गर्दी गोदावरीला भरते आले आहे. कधीही पूर येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र, या पाण्यातही अनेक जण पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. विशेषतः चौदा-पंधरा वर्षांच्या तरुण मुलांचा या समावेश दिसून येत आहे. रविवारी दिवसभर मुलांनी गोदाकाठच्या परिसरात पोहण्यासाठी गर्दी केली होती. या मुलांना येथे येण्यापासून मज्जाव करावा. अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Flood in Nashik district, one person was swept away in Valdevi river, a warning to the citizens of Godakath)

इतर बातम्याः

नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.