AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती दर्शनासाठी गेलेल्या मुलाचे गुजरातमध्ये अपहरण, 12 लाखांची मागणी, कसा रंगला सुटकेचा थरार?

वांगणी येथील एका अल्पवयीन मुलाचे गुजरातमध्ये गणपती दर्शनाला गेल्यावर अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांत तीन आरोपींना अटक केली आणि मुलाची सुटका केली.

गणपती दर्शनासाठी गेलेल्या मुलाचे गुजरातमध्ये अपहरण, 12 लाखांची मागणी, कसा रंगला सुटकेचा थरार?
| Updated on: Sep 12, 2025 | 9:06 AM
Share

तुम्ही गणपतीला दर्शनासाठी गेला आहात आणि अचानक तुमचे अपहरण झाले, तर काय होईल! असाच काहीसा प्रकार वांगणीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत घडला. १ सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी तो गुजरातमध्ये गेला होता. पण तिथेच तीन अज्ञातांनी त्याला पळवून नेले. यानंतर खंडणीसाठी त्याच्या आईला फोन आला. त्यानंतर ५ दिवसांचा थरार रंगला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या अपहरण प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावत वांगणीतील एका अल्पवयीन मुलाची गुजरातमधून सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींनाही अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

वांगणीमध्ये राहण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा मुलगा १ सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी गुजरातला गेला होता. तिथेच काही अज्ञात व्यक्तींनी त्याला पळवून नेले. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या आईकडे फोन करून १२ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. या धमकीनंतर घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ही तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर एक विशेष पथक गुजरातला रवाना केले. गुजरात पोलिसांच्या मदतीने अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी कबूल केले की त्यांनी घाबरून त्या मुलाला एका बस स्टॉपवर सोडून दिले होते. या घटनेमुळे मुलगा इतका घाबरला होता की त्याने आपला मोबाईल बंद करून सिमकार्ड बदलले. त्यामुळे सुरुवातीला त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले.

मात्र, पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी मुलाच्या मोबाईलचा IMEI नंबर ट्रेस केला. त्यावरून त्याचा नवा नंबर शोधून काढला. हा एक निर्णायक क्षण होता. ज्यामुळे पोलिसांना मुलाचा ठावठिकाणा कळू शकला. चार दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर पोलिसांना त्या मुलाला शोधण्यात यश आले. चाळीसगावजवळच्या एका खेड्यातून मुलाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. त्याला जेव्हा आईकडे परत देण्यात आले, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. दरम्यान हा थरारक तपास आणि मुलाची सुखरूप सुटका यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक