AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले

गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिला आहे. मात्र, यामागे राजकीय नाराजी असल्याची चर्चा आहे, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्या विधानानंतर. अजित पवार गटातील पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे होते, मात्र ते न मिळाल्यानेही नाराजी होती, असे म्हटले जाते.

अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले
| Updated on: Oct 15, 2025 | 10:46 AM
Share

राज्यात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषत अजित पवार गटात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.  बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. मात्र बाबासाहेब पाटील यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बाबासाहेब पाटील यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी  बोलताना बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगितले. गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे. मी रागात राजीनामा दिला नाही. गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला, असे बाबासाहेब पाटील म्हणाले.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे

यावेळी बाबासाहेब पाटील यांनी एक खंतही व्यक्त केली. मला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तशी इच्छा होती. मात्र राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यामुळे ते  मिळाले नाही, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केले होते. यावेळी त्यांनी विदर्भातील स्वत:च्या पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्री फक्त सहलीला येतात, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले होते.

नाराजीमुळे निर्माण झालेल्या दबावातून पद सोडले

पटेल यांच्या या टीकेनंतर लगेचच बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाटील यांचा राजीनामा केवळ प्रकृतीच्या कारणास्तव आहे की नाराजीमुळे निर्माण झालेल्या दबावातून त्यांनी पद सोडले, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. बाबासाहेब पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार आहेत.

बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडण्यामागे प्रकृतीचे कारण असेल तरी राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांची नाराजी हेच प्रमुख कारण मानले जात आहे. या राजीनाम्यामुळे विदर्भातील राजकारणाबद्दल चर्चा रंगली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...