AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Flood : गोंदिया जिल्ह्यात पुरामुळं 12 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, आमदार विनोद अग्रवाल यांनी बांधावर जाऊन केली पाहणी

गोंदिया जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिना हा नैसर्गिक आपत्तीचा महिना ठरला. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

Gondia Flood : गोंदिया जिल्ह्यात पुरामुळं 12 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, आमदार विनोद अग्रवाल यांनी बांधावर जाऊन केली पाहणी
आमदार विनोद अग्रवाल यांनी बांधावर जाऊन केली पाहणी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 21, 2022 | 3:27 PM
Share

गोंदिया जिल्ह्यात पुरामुळे 12 हजारावर हेक्टर शेती जमिनीवर लावण्यात आलेल्या धान पिकाचे नुकसान झालं. आमदार विनोद अग्रवाल यांनी बांधावर जाऊन केली नुकसान ग्रस्त शेती तसेच घरांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पाऊस व आलेल्या पुरामुळं 12 हजार हेक्टर शेत जमिनीवर लावण्यात आलेल्या पिकांचे नुकसान झाले. याच नुकसानग्रस्त शेताची पाहणी गोंदिया विधानसभा (Gondia Assembly) क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी केली. कृषी विभागासोबत (Department of Agriculture) पाहणी करीत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत. बसून आढावा घेणारे बरेच लोकप्रतिनिधी आहेत. पण, बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणारे फार कमी असतात. या शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर मदत मिळेल, अशी अपेक्षा विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केली.

22 हजार शेतकऱ्यांना फटका

गोंदिया जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या 666 गावातील 22 हजार 185 शेतकऱ्यांना बसला. यात तब्बल 12 हजार हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिसकावला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी हाक शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी तसेच शासन दरबारी लावली आहे. दुसरीकडे आता कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे करायला सुरवात केली आहे. अशी माहिती शेतकरी तुलेश्वर कटरे व कृषी अधिकारी हिंदुराज चव्हाण यांनी दिली.

दुबार पेरणीची वेळ निघून गेली

गोंदिया जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिना हा नैसर्गिक आपत्तीचा महिना ठरला. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या पावसाच्या थैमानाने तब्बल जिल्ह्यातील 12 हजार हेक्टरवरीर धानपीक निस्तनाबूत झाले आहेत. दुबार पेरणीचीही वेळ निघून गेली. 22 हजार 185 शेतकऱ्यांवर कपाळावर हात मांडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती कसली. मात्र पुरानेही ती वर्षभराची पुंजी हिरावून घेतली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी