AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला, कार वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, चिमुरडा बेपत्ता, पती बचावला

अपघातातून पती योगेश पडोळ हे काही अंतरावर बाहेर निघाले, मात्र त्यांची 38 वर्षीय पत्नी वर्षा पडोळ आणि 3 वर्षांचा मुलगा श्रेयन हे दोघे रात्रीच वाहून गेले होते.

पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला, कार वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, चिमुरडा बेपत्ता, पती बचावला
हिंगोलीत कार बुडून महिलेचा मृत्यू
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 12, 2021 | 9:52 AM
Share

हिंगोली : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हिंगोलीमध्ये कारमधून एकाच कुटुंबातील तिघे जण वाहून गेले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा तीन वर्षांचा चिमुरडा अद्याप बेपत्ता आहे. पतीला कारमधून बाहेर पडण्यात यश आल्यामुळे त्याचा जीव वाचला.

हिंगोली जिल्ह्यात काल (रविवारी) रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथून नातेवाईकांना भेटून पडोळ दाम्पत्य आपल्या मुलासह घरी निघाले होते. मात्र परत जाताना त्यांची कार गोळेगाव येथील पुलावरुन वाहून गेली.

नेमकं काय घडलं?

अपघातातून पती योगेश पडोळ हे काही अंतरावर बाहेर निघाले, मात्र त्यांची 38 वर्षीय पत्नी वर्षा पडोळ आणि 3 वर्षांचा मुलगा श्रेयन हे दोघे रात्रीच वाहून गेले होते. घटनास्थळावरुन काही अंतरावर वर्षा पडोळ यांचा मृतदेह आज (सोमवारी) सकाळी सापडला आहे, तर श्रेयन अद्यापही बेपत्ता आहे. पडोळ कुटुंबीय औंरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मॅक्स जीपही वाहून गेली

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कायाधु नदी भरुन वाहत असल्याने नदीचे पाणी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलावरुन वाहत होते. नांदेड-हिंगोली महामार्गावरील रात्री वाहनसेवा काही वेळ ठप्प झाली होती. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात ओढ्याला पूर आल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाजीपाला विक्री करुन येणाऱ्या शेतकऱ्याची एक मॅक्स जीप वाहून गेली. त्यातील दोघे जण सुखरुप बाहेर निघाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हिंगोलीत कार बुडून चौघा शिक्षकांचा अंत

दरम्यान, हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये गेल्या महिन्यात चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही काम सुरु असल्याने रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली.

पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली. पाण्यात बुडलेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला.

संबंधित बातम्या:

कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, गाडी लॉक झाली, पाण्यात बुडून चौघांचा अंत

Hingoli Accident | चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा

(Hingoli Car Drown in Flood Water Wife Dies Son Missing Husband Saved)

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?