AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआला विधानसभा निवडणुकीत किती जागा? महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचं मोठं भाकीत!

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.

मविआला विधानसभा निवडणुकीत किती जागा? महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचं मोठं भाकीत!
| Updated on: Nov 11, 2024 | 2:38 PM
Share

विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान यावेळी महायुतीविरोधात महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळत आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मतदार कोणाच्या बाजुनं कौल देणार राज्यात कोणाचं सरकार येणार महायुती की महाविकास आघाडी? याबाबत उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

जे कोणाचे सर्व्हे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाही आहे. लोकसभेला देखील सर्व्हे आले होते, महाविकास आघाडीला जागा मिळणार नाही, पण आम्ही प्रत्येक्षात राज्यात 31 जागा जिंकलो. महायुतीचे लोक कुठूनही सर्व्हे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. मी आपल्याला सांगत आहे की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे लोक चोऱ्या-माऱ्या करून जागा जिंकतात त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे, ते चंद्रचूड यांच्या कृपेने किंवा पंतप्रधान मोदी, शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती, बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच देखील पुढे सरकत नाही. तुमच्या पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोक हे अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे, तुमच्यासारखं ढोंगी प्रेम अजिबात नाही. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या का देत नाही आहात? त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?.
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान.
केवळ ताकद असून चालत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्यही लागते
केवळ ताकद असून चालत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्यही लागते.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी घसरण!
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी घसरण!.
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार! पाहा लाईव्ह बजेट अपडेट्स टीव्ही9 वर
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार! पाहा लाईव्ह बजेट अपडेट्स टीव्ही9 वर.
पिंकीताईंच्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न केलेत! रोहित पवारांची ग्वाही
पिंकीताईंच्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न केलेत! रोहित पवारांची ग्वाही.
Union Budget 2026 : देशात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंपल्प सादर होणार!
Union Budget 2026 : देशात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंपल्प सादर होणार!.