AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेदवार कसे निवडून आणणार? मनोज जरांगे पाटलांनी बैठकीनंतर सांगितला संपूर्ण प्लॅन

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीमधील बैठकीनंतर मराठा, दलित आणि मुस्लीम बांधवांना विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचं आवाहान केलं आहे.

उमेदवार कसे निवडून आणणार? मनोज जरांगे पाटलांनी बैठकीनंतर सांगितला संपूर्ण प्लॅन
| Updated on: Oct 31, 2024 | 7:06 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बौद्ध आणि मुस्लीम धर्मगुरुंची उपस्थिती होती. या बैठकीनंतर आम्ही मराठा, बौद्ध आणि मुस्लीम एकत्र आलो असून, सामीकरण जुळल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच ही बौठक संपल्यानंतर त्यांनी मराठा, मुस्लीम आणि दलीत बांधवांना निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

माझा एक सवाल आहे. आमचं ठरलं आहे. जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. जिथे मराठा उमेदवार दिला जाणार तिथे ताकदीने मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार आहेत. हे सर्व जातीच्या लोकांनी लक्षात ठेवा. जिथे बौद्ध उमेदवार किंवा राखीव वर्गातील उमेदवार असेल त्याला मुस्लिम आणि मराठा मतदारांनी ताकदीने मतदान करायचं. क्रॉस व्होटिंग करायचं नाही. जिथे मुस्लिम उमेदवार असेल तिथे दलित आणि मराठा क्रॉस मतदान करायचं नाही. ताकदीने मतदान करायचं आहे. दलित, मराठा आणि मुस्लिमांनी आता ताकदीने बाहेर पडायचं आहे. कितीही काही झालं तरी संयम बाळगायचा आहे.

दलित, मुस्लिम आणि मराठ्यांनी १०० टक्के मतदान करायचं आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सभा घेणार आहोत. सभेच्या दिवशीही एकाही दलित, मराठा, मुस्लिमांनी घरी राह्यचं नाही. अंतरवलीत ४ तारखेपर्यंत येऊ नका. मला कार्यक्रम ठरवायचा आहे. उमेदवार ठरवायचे आहेत. दलित, मराठा आणि मुस्लिमांना आमदार होऊ द्या. मग काय फोटो काढायचे ते काढा. पण आता मला काम करू द्या. तुम्ही या उठावात सामील व्हा. मला दोन चार दिवस मोकळं ठेवा. यांचा कार्यक्रमच लावतो.

निवडणुकीत अभ्यासक असलेल्या बांधवांनी मनाने यावं. आमंत्रणाची वाट पाहू नका. तुमची सर्वांची गरज आहे. बौद्ध भिक्खुंनी आपला संदेश जनतेपर्यंत द्यावा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन