AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Monsoon Forecast : 25 जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट; पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडू नका

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, तळकोकणात मान्सूनंच आगमन झालं आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

IMD Monsoon Forecast : 25 जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट; पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडू नका
राज्यात जोरदार पावसाचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 5:48 PM
Share

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहे. यंदा देशात विलंबनानं  मान्सूनचं आगमन झालं. काही दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर आता मान्सून शनिवारीच तळ कोकणात दाखल झाला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामना विभागानं राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अकोला जिल्हात पावसाचा यलो अलर्ट  

अकोला जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, 6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही ठाकाणी जिल्ह्यात विजांच्या  कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान  ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान जर पावसाचं आगमन झालं तर गेल्या  काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता 

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मात्र तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही वेळ लागू शकतो, येत्या 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने ट्विट करत देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्याची घाई करू नये, असं आवाहानही करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात