AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव? घडामोडींना वेग

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर दुसरीकडे एमआयएमने देखील मोठी मुसंडी मारली. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव? घडामोडींना वेग
शिवसेना शिंदे गटाकडून युतीचा प्रस्ताव?
| Updated on: Jan 19, 2026 | 5:35 PM
Share

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला राज्यात चांगलं यश मिळालं आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष ठरला आहे. तर सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. दरम्यान राज्यात आणखी एक असा पक्ष आहे, ज्याला महापालिका निवडणुकांमध्ये जबरदस्त यश मिळालं आहे, तो पक्ष म्हणजे एमआयएम, एमआयएमने महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.  मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांकडून एक प्रस्ताव आला होता, असा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले जलील?

मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत,  तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांकडून स्थानिक नेत्यांना एक प्रस्ताव आला होता, आपण सोबत येऊ शकता का? असा हा प्रस्ताव होता. परंतु आमचे तिकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी ठामपणे  नकार देत आम्ही भाजपसोबत किंवा शिवसेना शिंदे गटासोबत जाणार नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं, असा दावा जलील यांनी केला आहे, जलील यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलता जलील यांनी असं देखील म्हटलं  आहे की, तीन ते चार महापालिका अशा आहेत, जिथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ पडली तर सर्व पक्ष एकत्र येऊ.  पार्टीचे अध्यक्ष ओवेसी साहेबांनी स्पष्ट सांगितलय, सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असाल तर नक्की त्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह विचार करू, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं.

दरम्यान नोटा उधळण्यात आल्या होत्या, त्यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  जल्लोषाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आमचे निवडून आलेले 33 नगरसेवक होते. त्या ठिकाणी एका गायकाला बोलण्यात आलं होतं, तिथे काही उत्साही लोकांनी पैसे उधळले आहेत, त्यामुळे मला असं नाही वाटत की यामध्ये इम्तियाज जलील यांनी काही मोठा क्रामई केला आहे, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.