AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला चक्क सिंह आणि काही मिनिटांत बिबट्याची जोडी दिसल्याने खळबळ

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या तळोद्यात एका शेतकऱ्याने (farmer) सिंह (lion) आणि काही क्षणांत बिबट्याची जोडी (leopards) पाहिल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुनेही घेतले आहेत.

नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला चक्क सिंह आणि काही मिनिटांत बिबट्याची जोडी दिसल्याने खळबळ
संग्रहित.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 5:31 PM
Share

नाशिकः नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या तळोद्यात एका शेतकऱ्याने (farmer) सिंह (lion) आणि काही क्षणांत बिबट्याची जोडी (leopards) पाहिल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुनेही घेतले आहेत. (In Nandurbar, a farmer saw a lion, two leopards were also seen, fear in the area, inspection by forest department)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (9 सप्टेंबर) सकाळी उमाकांत शेडे हे शेतात होते. त्यांना पहाटे 6 च्या सुमारास शेताच्या बांधावर सिंहाचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. या सिंहाने चक्क तासभर या ठिकाणीच ठाण मांडले होते. त्यामुळे शेडे यांना हालचालही करता आली नाही. ते फक्त त्याच्याकडे एकटक बघत बसले. थोडीही हलचाल केल्यास सिंहाने झेप घेतली तर कसे, या विचाराने त्यांनी डोळ्यांसमोर मरण पाहिले. सिंह गेल्यानंतर काही मिनिटांत एक बिबट्या नर आणि मादी एका झाडावरून उतरल्याचेही त्यांना दिसले. अवघ्या काही मिनिटांत तीन हिंस्त्र प्राणी पाहिल्याने त्यांच्या हाता-पायातले त्राण हरपले. त्यांनी तातडीने घर गाठत आपल्या मुलांना ही माहिती दिली. बघता-बघता ही बातमी सगळीकडे पसरली. मुलांनी वनविभागालाही कळवले. त्यानंतर वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी वनरक्षक वीरसिंग पावरा, गिरधर पावरा, वासुदेव माळी यांच्यासह घटनास्थळ गाठले. या भागाची पाहणी केली. तिथे असलेल्या प्राण्यांच्या ठशांचे नमुने घेतले.

पायाचे ठसे मोठे

पथकाने बिबट्यांच्या पायांच्या ठशाचे नमुने घेतले. मात्र, यातील बांधावर उभ्या असललेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे मोठे आढळले आहेत. त्यामुळे हा सिंह असल्याची शक्यता वनविभागातील कर्मचारीही व्यक्त करत आहेत. आता या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहे. वरिष्ठांशी बोलून पिंजराही लावण्यात येणार आहे. या प्राण्यांना तात्काळ पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिबट्याचे नेहमीच दर्शन

तळोद्यात गेल्या शनिवारी 4 सप्टेंबर चक्क शहराजवळ बिबट्या दिसला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीची भीती होती. आता बिबट्याच्या जोडप्यासोबत सिंहही दिसल्याने नागरिकांची गाळण उडाली आहे. या भागात अनेकांची शेती आहे. बिबट्याच्या वावरामुळे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (In Nandurbar, a farmer saw a lion, two leopards were also seen, fear in the area, inspection by forest department)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये सोने 47600 वर, चांदी 1300 रुपयांनी महाग

त्र्यंबकबाबा महाराज यांचे निधन, राज्यभरातील भक्त शोकाकुल

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.