AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे न देखे रवी, ते देखे कवीः साहित्य संमेलनात नवलच; गीतामध्ये लोकहितवादींच्या जागी नाना शंकरशेठांचा फोटो

साहित्यिक प्रज्ञावंत असतात. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाचा वेध घेता येतो, असे मानतात. त्यामुळेच जे न देखे रवी, ते देखे कवी मानले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती घेता येतील. मात्र, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात अग्रभागी असणाऱ्या प्रज्ञावंतांना याचा काहीही गंध नाही, असेच दिसते.

जे न देखे रवी, ते देखे कवीः साहित्य संमेलनात नवलच; गीतामध्ये लोकहितवादींच्या जागी नाना शंकरशेठांचा फोटो
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि नाना शंकरशेठ.
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:51 AM
Share

नाशिकः साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण सुरूच आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक लोकहतिवादी मंडळ आहे. समाजसुधारक गोपाळ हरी देशमुखांच्या नावाने हे मंडळ चाललवले जाते. मात्र, संमेलन गीतामध्ये त्या लोकहितवादी यांच्या ऐवजी चक्क नाना शंकरशेठाचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यामुळे निमंत्रक नाराज असल्याचे समजते.

साहित्यिक प्रज्ञावंत असतात. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाचा वेध घेता येतो, असे मानतात. त्यामुळेच जे न देखे रवी, ते देखे कवी मानले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती घेता येतील. मात्र, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात अग्रभागी असणाऱ्या प्रज्ञावंतांना याचा काहीही गंध नाही, असेच दिसते. आता हेच पाहा संमेलन ज्या नाशिकमध्ये होतेय तिथले भूमीपुत्र आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक वि. दा. सावरकर यांचेच नाव संमेलन गीतामध्ये घेतले नाही. त्यावरून प्रचंड वाद झाला. अखेर गीतामध्ये सावरकरांचे नाव समाविष्ट करण्यात आले. हे प्रकरण थंड होत नाही तोच याच गीताबाबत आणखी एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. या गीतामध्ये चक्क लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांच्याऐवजी नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.

चित्रमहर्षी सूरतपस्वी वैभव नटश्रेष्ठांचे जनस्थान हे कर्मवीरांचे लोकहितवादाचे उद्योगाचे पर्यटनाचे शहर कला क्रीडाचे भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे जयंत आले हसरे तारे घेऊन भेटींसाठी अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक लोकहितवादी मंडळ आहे. आता त्यांच्याच नावाचा उल्लेख जिथे येतो, तिथे हा खोडसाळपणा केला आहे. लोकहितवादी आणि नाना शंकरशेठ यांच्या पगडीत, मिशात फरक आहे. दोघेही वेगवेगळे गंध लावायचे. हे इतके असूनही ही चूक झाली कशी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. बहुतेक आयोजकांनी गीताचा सारा भार अतिशय अजाणत्यांवर सोपवलेला दिसतोय. त्यांनी सरळ गुगलमध्ये जे चित्र दिसले, ते उचलून टाकले, झाले असावे. अन्यथा ही घोडचूक झालीच नसती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

इतर बातम्याः

40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.