AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक दिवस त्यांचा पत्त्याचा बंगला गायब होईल… उद्धव ठाकरे यांचा दावा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल अत्यंत मोठा दावा केला. सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून महापालिकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे.

एक दिवस त्यांचा पत्त्याचा बंगला गायब होईल… उद्धव ठाकरे यांचा दावा
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 09, 2026 | 8:50 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. त्यापूर्वी आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. आता नुकताच उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे बघायला मिळाले. दोघे मिळून राज्यातील महापालिका निवडणुका लढत आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने काय धमाका होतो हे येणाऱ्या 16 जानेवारीला स्पष्ट होईलच, त्यापूर्वी ठाकरे बंधुंनी गंभीर आरोप नुकताच भाजपावर केले. मुंबई, ठाणेसह राज्यातील सर्व महापालिका आमच्या हातात येणे आवश्यक असल्याचे ठाकरे बंधूंनी म्हटले.

नुकताच मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, या वेळेला भारतीय जनता पक्षातच बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, म्हणजे जसं राज मघाशी म्हणाला तसा त्याचा पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

राज ठाकरे म्हणाले की, लहानपणी सगळे पत्त्यांचा बंगला करायचो… त्यांच्याकडे सुद्धा बघितले तर पत्त्यांचा बंगला आहे. पण तो उलटा आहे. खालचा पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. आता हे जे सगळे बोलताहेत ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या जीवावर. भारतीय जनता पक्षाला आज जे मतदान होत आहे ते देखील फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावावर. यांच्या कोणाच्याही नावावर होत नाही.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, तुम्हाला सांगितले जाते की, महाराष्ट्र देशातला कोणताही माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. पण बाकींच्या राज्यात असे होते का… बाकीचे लोक त्यांच्याकडे येणारे लोढें बरोबर नियंत्रणात ठेवतात. पण आमच्याकडे आमचेच लोक सांगतात की, कोणीही कुठेही राहू शकते.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा