AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट…

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज पावसाचा अंदाज अनेक भागत वर्तवण्यात आल्या.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट...
Rain warning
| Updated on: Mar 03, 2026 | 7:12 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला. थंडी, पाऊस आणि उडाका असे समीकरण बघायला मिळाले. आता मार्च महिन्याला सुरूवात झाली. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात चढउतार बघायला मिळतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमानात चढउतार राहिल. यासोबतच उष्णतेत वाढ होईल. गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला असता राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात दुपारी जरी उकाडा जाणवत असला तरीही सकाळी गारठा आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल.

तब्बल इतक्या राज्यात पाऊस होण्याचा अंदाज 

देशातील अनेक राज्यात आज 3 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मार्च दरम्यान हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज 

कोकण आणि गोव्याच्या काही भागात 4 ते 7 मार्च दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, मार्चमध्ये ईशान्य भारत आणि वायव्य आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. यासोबतच दिल्लीमध्येही तापमानात चढउतार बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज 

आयएमडीनुसार 3 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 20 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील. पुढील 12 तास धोक्याची आहेत. हवामान खात्यानुसार, काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस अजूनही काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.