AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट…

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज पावसाचा अंदाज अनेक भागत वर्तवण्यात आल्या.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट...
Rain warning
| Updated on: Mar 03, 2026 | 7:12 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला. थंडी, पाऊस आणि उडाका असे समीकरण बघायला मिळाले. आता मार्च महिन्याला सुरूवात झाली. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात चढउतार बघायला मिळतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमानात चढउतार राहिल. यासोबतच उष्णतेत वाढ होईल. गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला असता राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात दुपारी जरी उकाडा जाणवत असला तरीही सकाळी गारठा आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल.

तब्बल इतक्या राज्यात पाऊस होण्याचा अंदाज 

देशातील अनेक राज्यात आज 3 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मार्च दरम्यान हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज 

कोकण आणि गोव्याच्या काही भागात 4 ते 7 मार्च दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, मार्चमध्ये ईशान्य भारत आणि वायव्य आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. यासोबतच दिल्लीमध्येही तापमानात चढउतार बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज 

आयएमडीनुसार 3 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 20 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील. पुढील 12 तास धोक्याची आहेत. हवामान खात्यानुसार, काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस अजूनही काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.