AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढील 24 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून..

Maharashtra Weather Update : ऐन दिवाळी तोंडावर असताना भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर संकट! 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढील 24 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून..
Thunderstorm Rain
| Updated on: Oct 17, 2025 | 6:58 AM
Share

काही दिवसांपूर्वी राज्यात पाऊस झोडपताना दिसला. अनेक भागात मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक वाहून गेले. विशेष: मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. मॉन्सून राज्यातून गेल्याचे सांगितले जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे, कोकण, मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाहीये. 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातील लक्षव्दीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहे. केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला. यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळतंय.

मराठवाड्यातील काही भागात, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला. काल सायंकाली ठाणे जिल्हात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता. भारतीय हवामान विभागाने 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा  निर्माण होण्याचे संकेत आहेत.

यामुळे हे स्पष्ट आहे की, राज्यातून मॉन्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कामयमच राहणार आहेत. 19 आँक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. या पावसाचा अधिक प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. 15 जिल्हांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.