AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांनो दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळा, राज्यावर दुहेरी संकट, थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही भागात अवकाळी पाऊस बरसणार आहे.

नागरिकांनो दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळा, राज्यावर दुहेरी संकट, थेट..
warning
| Updated on: Apr 23, 2026 | 7:14 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. सध्या राज्यावर दुहेरी संकट आहे. उष्णतेसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे पिकांची वाट लागली असून शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यामध्येच आजही पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला. कोकणासह अन्य भागात आज उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय पडू नये. सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, धाराशिव, कोल्हापूर, लातूर, नांदेड या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता. आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्र, पावसाचा येलो अलर्ट जारी.  वादळी पाऊस होणार असल्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव,लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर ,यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी.

हवामानातील बदलाचा फटका आरोग्यावरही दिसत आहे. करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. करमाळा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील कंदर, सातोली गावासह काही भागात गारांचा पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागाला अवकाळी पाऊस व गारपीटीने चांगले झोडपले.  येवल्याच्या कुसुर कुसमाडी अंकाई नायगव्हाण या गावातील शेकडो हेक्टर कांदा शेती उध्वस्त झाली आहे. कुसमाडी येथील दिलीप मेंगाळ या शेतकऱ्याचा काढणीस आलेला दहा एकर कांदा गारपिटीमुळे खराब झाल्याने उत्पादन खर्च व उत्पन्न वाया गेल्याने शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी केली.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.