AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 3 तास धोक्याचे, प्रशासनाचा मोठा इशारा, राज्यावर आसमानी संकट, थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यावर मोठं संकट आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत.

पुढील 3 तास धोक्याचे, प्रशासनाचा मोठा इशारा, राज्यावर आसमानी संकट, थेट..
Unseasonal rains
| Updated on: Apr 21, 2026 | 7:12 AM
Share

राज्यावर पावसाचे सावट कायम आहे. आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. काही भागात पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आज गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचाही मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच पुढील 3 तासात मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर येथील काही भागात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली. नांदेड, हिंगोली, धाराशिव, सांगली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. एकीकडे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली तर दुसरीकडे मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागला.

मराठवाड्यात पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तशी 30 ते 40 किलोमीटर वेगानेवादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे, तर संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरून सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार