AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी..

Maharashtra Weather : आज राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा इशारा दिला. 15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे.

आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी..
Maharashtra Weather
| Updated on: Jun 09, 2026 | 7:07 AM
Share

15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सूनचा पाऊस होण्याची कमी शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले. आता मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीकरिता गडबड करून नये, असेही सांगण्यात आले. यावेळी दोन दिवस केरळमध्ये उशिराने मॉन्सून दाखल झाला. मात्र, आता तो अधिक रेगाळताना दिसतोय. दक्षिण कोकणासह राज्यात काही भागात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जोरदार आज पाऊस होईल. राज्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. राजापूर, वैभववाडी, रामेश्वर, चिपळून,सांगली, मिरज, शिराळा, हातकणंगले, जेरूर, कळंम, लातूर, पूर्णा, धारूर, अहमदपूर या भागात पावसाने हजेरी लावली. आजही काही भागात पावसाचा अंदाज आहे. प्रशासनाकडून शेतकरी आणि नागरिक यांच्याकरिता काही सूचना मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्यात.

पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसा अभावी खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करतोय. बळीराजाने खरिपातील पिकांच्या पेरणीसाठी शेती सज्ज करून ठेवली आहे. मात्र, पाऊस नसल्याने खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्यात. सद्यःस्थितीला शेतकऱ्यांची शेतीकामे उरकली असून बहुतांशी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बी-बियाणे खरेदी करून ठेवलेत.

प्रशासनानेही 15 तारखे पर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याने.. तोपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र धूळ पेरणीला काही शेतकऱ्यांनी सुरुवात केलीय. यामुळे दुबार पेरणीचं संकट उडवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह झाला.

मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने हळद लावगड केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. राज्यात अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. पाऊस हजेरी लावत असतानाच पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी आताच पेरण्या करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या आवाहनानंतरही काही शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे. ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा