AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुन्हा कोसळणार पाऊल! तब्बल इतक्या जिल्ह्यांवर मोठे संकट, हवामान विभागाने..

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आताही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

IMD Weather Update : पुन्हा कोसळणार पाऊल! तब्बल इतक्या जिल्ह्यांवर मोठे संकट, हवामान विभागाने..
Rain
| Updated on: Mar 21, 2026 | 7:22 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मार्च महिन्यातही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अनेक भागात पावसाने गारपिटीचा दणका दिला आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे. आज राज्यातील अनेक भागात पाऊस होणार असून हवामानात चढउतार बघायला मिळेल.

आज दुपारनंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यान या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसामुळे 51 हजार हेक्टरवर नुकसान रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका बसला असल्याची माहिती आहे. राज्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पाऊस वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. राज्यभरात सुमारे 51,488.54 हेक्टर क्षेत्रात वरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेलूद शिवारात अवकाळी पाऊस आणि गारपीटने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कौतिकराव इंगळे यांनी आपल्या दोन एकर शेतापैकी एक एकर शेतात केळी पिकाची लागवड केली. काल केळी पिक चांगले दिसत होते, मात्र दुपारी आलेल्या गारपिटी ने केळीची संपूर्ण पाने फाटली आणि काळे डाग पडत आहेत..पुढील काळात गारपीट ने केळी वर आणखी रोगराई येण्याची शकता असून उत्पादनात घट येऊ शकते.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......