AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठ संकट! थंडीच्या लाटेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याची…

Maharashtra Weather Update : राज्यात भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा देत येलो अलर्ट जारी केला. मागील काही दिवसांपासून देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यावर मोठ संकट! थंडीच्या लाटेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याची...
yellow alert
| Updated on: Nov 17, 2025 | 7:29 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात चक्क पाऊस पडताना दिसला. राज्यात आता गारठा वाढला असून थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आलाय. मात्र, देशावरील पावसाचे ढग अजूनही कायमच असल्याचे बघायला मिळतंय. अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. पुण्यात थंडीचा कडाका वाढला किमान तापमान 10.6°c वर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. निफाड, धुळ्यात पारा आठ अंशावर पोहोचला. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू असल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. पहाटे धुके पडत असून दव पडत आहेत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देत येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

परभणीमध्य़े 8.5 अंश तापमानाची नोंद झाली. गोदिंया, जेऊर, भंडारा 10 अंशपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात जरी थंडी वाढत असतील तरीही देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसासह जोरदार वारे वाहणार आहे. काल केरळच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती असून असूनही मुसळधार पावसाचे संकट कायम आहे.

17, 18, 19, 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस बघायला मिळेल. 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.