AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, मोठं संकट, या जिल्ह्यात कोचिंग क्लासेससह..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उष्णता वाढत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे. पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत.

दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, मोठं संकट, या जिल्ह्यात कोचिंग क्लासेससह..
Heat warning
| Updated on: Apr 26, 2026 | 7:52 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अकोल्यात 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी अकोला, अमरावती, चंद्रपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. राज्य दुहेरी संकटात आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट असून याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो अकोलाकरांना बसत आहे. काल अकोलाचा तापमान 45 इतकं होत. सततच्या वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले.आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे, भरपूर पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यासोबतच आजपासून अनेक ठिकाणी शाळा आणि क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगावात उष्णतेची तीव्रता वाढली असून 43.4°C तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील यंदाचे सर्वाधिक तापमान जुन्या नोंदी मोडल्या. कडक उन्हामुळे नागरिक हैराण दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र. वाढत्या तापमानामुळे रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. दुपारी 12 ते 4 दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे झेंडू फुलांच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून उष्णतेच्या तडाख्यामुळे फुलांची वाढ खुंटणे, कळ्या गळणे आणि फुलांची गुणवत्ता घसरणे असे परिणाम दिसून आले आहेत. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून बाजारातील आवकही कमी झाली आहे. त्यातच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने झेंडू फुलांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर