AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 ते 5 घराबाहेर पडू नका, सावधान, राज्यातील तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये..

नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. यादरम्यान दुपारी घरातून बाहेर पडणे टाळा. आज भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. दुपारी 38 च्या पुढे उच्चांकी तापमान जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.

12 ते 5 घराबाहेर पडू नका, सावधान, राज्यातील तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये..
Heat
| Updated on: Mar 24, 2026 | 9:43 AM
Share

मार्च महिना संपत आहे. यादरम्यान कडाक्याचे उन्ह काही भागात पडले आहे. यादरम्यानच मराठवाड्यासह काही भागात पाऊस अजूनही हजेरी लावत आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा नुकताच मोठा अलर्ट जारी केला. आज दुपारी घराबाहेर पडणे टाळाच. अतिमहत्वाचे काम असेल तर टोपी, रूमाल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडा. भारतीय हवामान विभागाने आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला. यामुळे उन्हाळ्यात आजारी पडायचे नसेल तर शक्यतो आज दुपारी घराबाहेर पडणे टाळाच. उष्णता आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला. राज्यातील एका भागात जोरदार पाऊस सुरू आहे तर दुसऱ्या भागात थेट उष्णता आणि दमटचा इशारा देण्यात आला. आज दुपारी 12 ते 5 घराबाहेर पडणे टाळा, यादरम्यान उन्हाचा कडाका अधिक असेल. जर आपण यादरम्यानच्या काळात घराबाहेर पडलो तर उन्ह लागल्याने आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे.

मार्च महिन्यातच उन्हाचा चटका वाढल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. सोमवारपेक्षा मंगळवारी उष्णता अधिक असेल असा अंदाज आहे. यासोबतच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले. मुंबईमध्ये पारा 36 अंश सेल्सिअसच्या पुढे सोमवारी गेला.

आज 38 अंशावर पारा पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. यादरम्यान दमट वातावरणही राहिल. 38 अंश सेल्सिअस पारा असताना घराबाहेर पडणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे उन्ह लागण्याची शक्यता अधिक आहे, यादरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळलेले अधिक फायदेशीर आहे. यासोबतच पाणीसोबत ठेवणेही आवश्यक आहे.

यासोबतच राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता उष्णता देखील वाढत आहे. राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचे संकट जाईल.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.