AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-वडिलांमागून दोन्ही मुलांचा मृत्यू, 17 दिवसात चौघांचा अंत, सुनांवर आभाळ कोसळलं

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेला (Jalgaon Family Dies of COVID )

आई-वडिलांमागून दोन्ही मुलांचा मृत्यू, 17 दिवसात चौघांचा अंत, सुनांवर आभाळ कोसळलं
येवले कुटुंबातील चौघांचा कोरोना सदृश आजाराने बळी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 12:18 PM
Share

जळगाव : कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अवघ्या सतरा दिवसात अंत झाला. पाच-पाच दिवसांच्या अंतराने येवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येवलेंच्या घराजवळील काही शेजारी कुटुंबांनी कोरोनाच्या धास्तीने थेट जंगलातच संसार थाटला आहे. (Jalgaon Muktainagar Yeole Family Dies of COVID like disease within 17 Days)

कोरोनाचा कहर काही केल्या थांबता थांबेनासा झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा यात समावेश आहे. आधी आई-वडिलांवर काळाने घाला घातला, त्यानंतर धाकटा भाऊ गेला. तर अखेर मोठ्या भावाचाही जळगावच्या कोविड सेंटर गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला.

आई वडिलांची चिता शांत होईपर्यंत मुलं कालवश

काकोडा गावातील अहिल्याबाई होळकर नगरातील रत्नमाला येवले यांचा दिनांक 17 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती रमेश येवले यांचीही प्राणज्योत मालवली. आई वडिलांची चितेची आग शांत होत नाही, तोवर दोन्ही मुलांचाही दुर्दैवी अंत झाला. आधी रवींद्र येवले आणि नंतर मोठा मुलगा चंद्रकांत येवले याचाही पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला

घरचे पुरुषच गेल्याने महिलांवर जबाबदारी

दोन्ही मुलांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहेत. एका भावाला दोन मुले आणि एक मुलगी, तर दुसऱ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी. घरची जबाबदारी आता या दोन्ही महिलांवर आली आहे. मात्र या कोरोनाचा काळात दोन्ही महिला आपापल्या माहेरी मुलाबाळांना घेऊन निघून गेल्या आहेत. (Jalgaon Family Dies of COVID )

कष्टकरी कुटुंब म्हणून ओळख होती

एक मुलगा गाव खेड्यांमध्ये गोळ्या बिस्कीट विकत होता तर दुसरा मातकामाला जात होता. मेहनतीच्या बळावर यांनी कुटुंबाच्या विकासासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ही स्वप्नं त्यांच्या निधनाने विरुन गेली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कोरोनाचा खैरे कुटुंबावर घाला, आधी पत्नी, मग वकील कन्येचा मृत्यू, आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरेंचे निधन

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं

(Jalgaon Family Dies of COVID )

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक