AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीकडून 24 कोटींचे दागिने, 1 कोटी 11 लाख रोख, 60 मालमत्तांची कागदपत्रे जप्त

जळगावात ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला. याशिवाय या ज्वेलर्सशी संबंधित अनेक ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. जवळपास 40 तास ईडीकडून झाडाझडती सुरु होती. या कारवाईत ईडीने कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीकडून 24 कोटींचे दागिने, 1 कोटी 11 लाख रोख, 60 मालमत्तांची कागदपत्रे जप्त
| Edited By: | Updated on: Aug 20, 2023 | 1:22 AM
Share

जळगाव | 19 ऑगस्ट 2023 : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी धाड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणात 24 कोटी 7 लाखांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाखांची रक्कम जप्त केली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि जळगावमध्ये धाडी टाकल्या होत्या. जैन यांच्या 50 कोटींच्या 60 मालमत्तांची कागदपत्रेसुद्धा ईडीने आपल्या हाती घेतले आहेत. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

ईडीने गेल्या काही महिन्यांपासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत जितकी मालमत्ता जप्त केली नव्हती तितकी मालमत्ता जळगाव राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मालकांवर केलेल्या धाडीतूनल जप्त केली आहे. ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित 13 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्याममध्ये 39 किलो सोन्याचे दागिने, हिरे जप्त करण्यात आले. याची किंमत 24 कोटी 7 लाख रुपये इतकी होती.

1 कोटी 11 लाखांची रोख रक्कम जप्त

ईडीकडून या कारवाईत 1 कोटी 11 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 60 मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत, ज्यांची किंमत 50 कोटी इतकी आहे. याशिवाय जैन यांच्या नावे जळगाव आणि जामनेरमध्ये दोन बेनामी मालमत्ता सापडल्या आहेत. त्यामुळे ईडी याप्रकरणी सविस्तर तपास करत आहे.

विशेष म्हणजे ईडीच्या 60 अधिकाऱ्यांकडून ही धाडसत्राची मोहिम राबवण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांची ही कारवाई सलग 40 तास सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापा टाकला. या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. ईडीने सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, माजी आमदार मनिष जैन यांनी या कारवाईनंतर आपण अजून हार मानलेली नाही. त्यामुळे पुढच्या सर्व कायदेशीर गोष्टींना सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ईश्वरलाल जैन यांनीसुद्धा ईडीच्या या कारवाईवर आक्षेप घेतलाय. त्यांनी ईडी ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ते चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एसबीआय बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाचा विषय माध्यमांना सांगितला होता. त्यातून हे सगळं घडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.