AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर घाणेरडे मिम्स, एकनाथ खडसे यांचं म्हणणं काय?

सोशल मीडियावर याबाबत अतिशय घाणेरडे मिम्स येत आहेत. अविवाहित राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असं ठासून सांगणारे राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसले.

सोशल मीडियावर घाणेरडे मिम्स, एकनाथ खडसे यांचं म्हणणं काय?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 09, 2023 | 4:38 AM
Share

जळगाव : महाराष्ट्रात सध्या किळसवाणे राजकारण सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकमेकांवर टीका करणारे हातात हात घालून उभे आहेत, असं खडसे यांनी म्हंटलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, अलीकडच्या काळात राज्यात राजकारण सुरू आहे. हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही. नाही, नाही नाही.

शब्द वापरले ते विषारी

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधानसभेत आणि विधानसभेबाहेर शब्द वापरले ते विषारी टीका करणारे होते. या तिन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. एकमेकांविरोधातील संताप लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय.

अविवाहित राहू पण,…

सोशल मीडियावर याबाबत अतिशय घाणेरडे मिम्स येत आहेत. अविवाहित राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असं ठासून सांगणारे राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसले. असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. बऱ्याचदा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभा सभागृहात आणि बाहेरही विषारी टीका केली होती.,

महाविकास आघाडी हाच पर्याय

एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं होतं. आता तेच सत्तेत हातात हात घालून एकत्र आले आहेत. हे राज्यातील जनतेला काही पटलेलं नाही. याविषयी सोशल मीडियावर जनतेत एक संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत जनतेला आता राज्यात महाविकास आघाडी हाच पर्याय पर्याय दिसत आहे असेही खडसे म्हणाले.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार