AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ

साकेगाव येथील वाघूर (Waghur) नदीवरील रेल्वेचा पूल आहे. या परिसरात नदीकाठावर सुमारे दहा ते बारा वर्षांच्या मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केल्यावर मृतदेह कुजल्याचे लक्षात आले.

Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 2:58 PM
Share

जळगावः साकेगाव (Sakegaon) येथे रेल्वे पूर परिसरात वाघूर नदी काठावर एका बारा वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खबळ उडालीय. हा मृतदेह (Dead body) नेमका कोणाचा आहे, तो नदीपात्रात कसा आला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. साकेगाव येथील वाघूर (Waghur) नदीवरील रेल्वेचा पूल आहे. या परिसरात नदीकाठावर सुमारे दहा ते बारा वर्षांच्या मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केल्यावर मृतदेह कुजल्याचे लक्षात आले. दरम्यान, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची नोंद मध्यंतरी झाली होती. त्यानुषंगाने तेथील पालकांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. मात्र, मृत मुलगा त्यांचा मुलगा नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी केले अंत्यसंस्कार…

भुसावळ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी व सहकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांनी परिसरातील विविध गावांमध्ये माहिती देऊन कुणाचा मुलगा हरवला आहे का? याचा शोध घेतला. पण, उपयोग झाला नाही. दरम्यान, नियमानुसार अनोळखी मृतदेह तीन दिवस जतन करून ठेवण्याच्या स्थितीत नव्हता. यामुळे पोलिसांनी साकेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सायंकाळी अंत्यसंस्कार केले. भानखेडा येथील पोलिस पाटील शरद पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली. एपीआय प्रकाश वानखेडे, जगदीश भोई हे तपास करत आहेत.

पालकांना केले आवाहन…

जळगाव पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांना पोहण्यासाठी एकटे सोडू नका, असे आवाहन केले आहे. अनेक लहान मुले उन्हाळ्यात घराबाहेर पडतात. काही जणांना पोहता येत नसते. तरीही ते नदीपात्रात आणि विहिरीत अंघोळ करण्यासाठी जातात. यामुळे अनर्थ ओढवू शकते. हे टाळण्यासाठी आपली मुले दिवसभर घराबाहेर असतात. तर ते काय करतात, यावर पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.