AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?

Sanjay Raut on Uddhav Thacekray Jalgoan Sabha : मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचं कौतुक; जळगावच्या जाहीर सभेत संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?
| Updated on: Sep 10, 2023 | 3:35 PM
Share

जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांचं कौतुक केलं आहे. मुंबईत बसून ते देशातील घडामोडींवर लक्ष ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे… आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही, आमचं राजकारण मुंबईत मातोश्रीवरूनच होईल, असं संजय राऊत म्हणाले.

आजच्या या सभेला गर्दी होईल की नाही, असं वाटत होतं. अरे चार टकले गेले म्हणजे शिवसेना गेली नाही. शिवसेना समोर आहे. उद्धव ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी चार टकल्यांनी ताकद लावली. पण आम्ही आलो आणि उद्धवजी आले आणि त्यांनी जळगाव जिंकलं. जळगावकरांचं उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम कायम आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाषणाला सुरुवात केली.

आजच्या सभेने चार टकल्यांना धडकी भरली असेल उद्या ते बाहेर पडणार नाहीत. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचे नेतृत्व करतील. आजचा हा शुभसंकेत आहे. आज ते मुख्यमंत्री नसले तरी नेतृत्व करत आहे. सत्ता येते जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे. चार आमदार गेले तर 10 निवडून आणू. घराघरात आणि मनामनात शिवसेना आहे. सोडून गेले ते गद्दार आहेत. ते अजूनही जनतेत जाऊ शकत नाही. त्यांच्या मनात चपला आणि जोडे मारतील अशी भीती वाटत आहे. जळगावचे लोक उद्धवजींच्या पाठीशी आहेत. येत्या काळातही जनता आपल्या मागे उभी राहील आणि या गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. इथं सांडेश्वराचं मंदिर आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शिवाजी महाराजांची तलवार होताना ती जाताना शिवसेनेकडे देऊन गेले, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.