AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?

Sanjay Raut on Uddhav Thacekray Jalgoan Sabha : मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचं कौतुक; जळगावच्या जाहीर सभेत संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?
| Updated on: Sep 10, 2023 | 3:35 PM
Share

जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांचं कौतुक केलं आहे. मुंबईत बसून ते देशातील घडामोडींवर लक्ष ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे… आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही, आमचं राजकारण मुंबईत मातोश्रीवरूनच होईल, असं संजय राऊत म्हणाले.

आजच्या या सभेला गर्दी होईल की नाही, असं वाटत होतं. अरे चार टकले गेले म्हणजे शिवसेना गेली नाही. शिवसेना समोर आहे. उद्धव ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी चार टकल्यांनी ताकद लावली. पण आम्ही आलो आणि उद्धवजी आले आणि त्यांनी जळगाव जिंकलं. जळगावकरांचं उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम कायम आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाषणाला सुरुवात केली.

आजच्या सभेने चार टकल्यांना धडकी भरली असेल उद्या ते बाहेर पडणार नाहीत. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचे नेतृत्व करतील. आजचा हा शुभसंकेत आहे. आज ते मुख्यमंत्री नसले तरी नेतृत्व करत आहे. सत्ता येते जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे. चार आमदार गेले तर 10 निवडून आणू. घराघरात आणि मनामनात शिवसेना आहे. सोडून गेले ते गद्दार आहेत. ते अजूनही जनतेत जाऊ शकत नाही. त्यांच्या मनात चपला आणि जोडे मारतील अशी भीती वाटत आहे. जळगावचे लोक उद्धवजींच्या पाठीशी आहेत. येत्या काळातही जनता आपल्या मागे उभी राहील आणि या गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. इथं सांडेश्वराचं मंदिर आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शिवाजी महाराजांची तलवार होताना ती जाताना शिवसेनेकडे देऊन गेले, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...