AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?

Sanjay Raut on Uddhav Thacekray Jalgoan Sabha : मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचं कौतुक; जळगावच्या जाहीर सभेत संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?
| Updated on: Sep 10, 2023 | 3:35 PM
Share

जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांचं कौतुक केलं आहे. मुंबईत बसून ते देशातील घडामोडींवर लक्ष ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे… आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही, आमचं राजकारण मुंबईत मातोश्रीवरूनच होईल, असं संजय राऊत म्हणाले.

आजच्या या सभेला गर्दी होईल की नाही, असं वाटत होतं. अरे चार टकले गेले म्हणजे शिवसेना गेली नाही. शिवसेना समोर आहे. उद्धव ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी चार टकल्यांनी ताकद लावली. पण आम्ही आलो आणि उद्धवजी आले आणि त्यांनी जळगाव जिंकलं. जळगावकरांचं उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम कायम आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाषणाला सुरुवात केली.

आजच्या सभेने चार टकल्यांना धडकी भरली असेल उद्या ते बाहेर पडणार नाहीत. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचे नेतृत्व करतील. आजचा हा शुभसंकेत आहे. आज ते मुख्यमंत्री नसले तरी नेतृत्व करत आहे. सत्ता येते जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे. चार आमदार गेले तर 10 निवडून आणू. घराघरात आणि मनामनात शिवसेना आहे. सोडून गेले ते गद्दार आहेत. ते अजूनही जनतेत जाऊ शकत नाही. त्यांच्या मनात चपला आणि जोडे मारतील अशी भीती वाटत आहे. जळगावचे लोक उद्धवजींच्या पाठीशी आहेत. येत्या काळातही जनता आपल्या मागे उभी राहील आणि या गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. इथं सांडेश्वराचं मंदिर आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शिवाजी महाराजांची तलवार होताना ती जाताना शिवसेनेकडे देऊन गेले, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....