AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सांगावं आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही”; भाजपने आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र दिलं..

विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नाही असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडले.

हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सांगावं आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही; भाजपने आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र दिलं..
| Updated on: Mar 27, 2023 | 10:26 PM
Share

जळगाव : मालेगावच्या सभेत माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केलेली आम्ही खपवून घेणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले होते.त्यांच्या याच वक्तव्यावरून आता सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सांगावं की आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांना सांगितले आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना तंबी देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नाही असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडले.गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरून त्यांनी हिंदुत्वाची तत्व कशी गुंडाळून ठेवली असल्याचे म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.