AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, घडामोडींना वेग

जळगावमधून (Jalgaon) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलीय.

जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, घडामोडींना वेग
| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 5:19 PM
Share

जळगाव : जळगावमधून (Jalgaon) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केलीय. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाची जळगावातील ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या तेव्हादेखील मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. सुषमा अंधारे यांनी त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे तरुण तडफदार नवा चेहरा त्या निमित्ताने समोर आला. जळगावातील शरद कोळी नावाचा तरुणांची महाराष्ट्राशी ओळख झाली. शरद कोळी यांनी अतिशय आक्रमकपणे शिंदे गटावर निशाणा साधला. शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता.

अखेर शरद कोळी यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यावेळी शरद कोळी यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. त्यानिमित्ताने जळगावच्या राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर कोळी यांना जळगावात भाषणास बंदी घालण्यात आली.

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर तोडघा निघणार?

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात समाविष्ट करुन घेतलं आहे. ठाकरे आणि शिंदे गटातला हा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पोहोचला आहे. दोन्ही ठिकाणी युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण आधी व्हॅकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण आलं. त्यानंतर आता पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण आलं. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर गेल्या तीन दिवसांसून सुनावणी सुरु होती. याल दरम्यान आज झालेली सुनावणी महत्त्वाची मानली जातेय.

ठाकरे गटाने हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का? असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना करण्यात आला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने त्यावर काहीच भाष्य केलं न. आता हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.