AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही”; अवकाळीच्या नुकसानीनंतर या मंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश

नुकसानग्रस्त झालेल्या शेतीच्या पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सुचनाही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; अवकाळीच्या नुकसानीनंतर या मंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश
| Updated on: Apr 30, 2023 | 8:50 PM
Share

जालना : गेल्या दोन तीन महिन्यांपासून राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अवकाळी आणि गारपीट तर दुसरकडे शेत मालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी अनेकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.

आजही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे.

त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतीच्या नुकसानबाबत आणि पंचनामा करण्यासंदर्भात कडक शब्दात आदेश दिले आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावरून अधिकाऱ्यांना एकही शेतकरी या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन तुम्ही पंचनामे करा असे आदेश देण्यात आले आहेत. कृषीमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला व शेतकऱ्यांना धीरही दिला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार संतोष दानवे हेदेखील उपस्थित होते.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देशही मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नुकसानग्रस्त झालेल्या शेतीच्या पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सुचनाही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...