AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही”; या आमदाराने अनुभवाचे बोल सांगितले…

टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी या बैठकीला का उपस्थित नसतात असा सवालही त्यांनी यावेळी उभा केला आहे.

कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही; या आमदाराने अनुभवाचे बोल सांगितले...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 08, 2023 | 4:38 PM
Share

जालना : देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही सरकारकडे कोरोनाविषयी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सध्या जलदगतीने कोरोनाचे रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, जालना, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विविध जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुले चिंचा व्यक्त केली जात आहे.

ज्या प्रमाणे कोरोनाचे पेशंट वाढले जात आहेत, त्याच प्रमाणे राज्यातील काही भागात कोरोनामुळे रुग्ण दगवल्याच्याही घटना घडल्या आहेत.

त्यामुळेच माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे. सध्या कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने आमदार राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत आरोग्य विभागाने सतर्क राहून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे.

त्या गोष्टी तयार ठेवायला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. यामुळे राजेशे टोपे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या जलदगतीन वाढत आहे.

त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेता येणार नसून,सरकार ने जागरूक होऊन लोकांना जागृत करण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दक्षता घेण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणा आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून टास्क फोर्सची बैठक होताना सरकारचे अधिकारी उपस्थित नसतात असा आरोप माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीचे उपाय करून, मास्क, लस बाबत एक धोरण ठरवण्याची गरज आहे. याशिवाय औषधांच्या उपलब्धतेची सरकारकडून पडताळणी झाली पाहिजे असंही टोपे यांनी सांगितले आहे.

टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी या बैठकीला का उपस्थित नसतात असा सवालही त्यांनी यावेळी उभा केला आहे. त्यामुळे राजेश टोपे यांनी ज्या प्रमाणे कोरोनाविषयी सरकारला विनंती केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी सरकारला एक प्रकारचा इशाराही दिला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार